शिवसेनेचे नरेश म्हस्के यांचा ठाणे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा

  160

ठाणे (हिं.स.) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाला आव्हान देत बंडखोरी केली आहे. त्यात तब्बल ४० आमदार त्यांच्यासोबत आसाममध्ये आहेत. गेले आठवडाभर हे राजकीय नाट्य सुरू आहे. दरम्यान ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तेथेही शिंदे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे जवळचे ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी शनिवारी रात्री जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. म्हस्के यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला राजीनामा सादर केला आहे. या पत्रात त्यांनी आपल्या मनातील खदखद आणि भावना व्यक्त केल्या आहेत.


म्हस्के यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीसोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेली अडीच वर्षे शिवसेनेची 'राष्ट्रवादी' गळचेपी चालली असून त्याचा निषेध म्हणून आपण जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा... जात, गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना...! त्यामुळे शिवसैनिक होतो, आणि राहणारच... पण गेली अडीच वर्षे आपल्या संघटनेची 'राष्ट्रवादी' गळचेपी चालली आहे.


एकीकडे शिवसेनेच्या आमदारांवर सरकारमध्ये असताना अन्याय होत होता, मात्र ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी वितरीत केला. त्यांनी नेहमीच पक्षाच्या विकासाचाच विचार केला. म्हणूनच त्यांनी जे केले ते योग्यच होते. आम्ही आजही शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत. ठाणे महानगरपालिकेतील सर्व ६७ माजी नगरसेवक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनीच ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व केले आणि म्हणूनच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत, असेही ते पुढे म्हणाले.

Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ