राजकीय तणावाचा पोलिसांवर ताण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात निर्माण झालेली राजकीय खळबळ आणि आंदोलन पाहता मुंबई राजकीय तणावाचा पोलिसांवर ताण आला असून रजेवर गेलेल्या पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.


महाराष्ट्र सध्या राजकीय घडामोंडींनी ढवळून निघत असून राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच लागलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरू झालं. राज्यात आज अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आसाममधील गुवाहाटीत गेलेल्या काही आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. राज्यात निर्माण झालेली राजकीय खळबळ आणि आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी रजेवर गेलेल्या पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे.


शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. यानंतर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज्याच्या विविध भागात शिंदे विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. शहरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी पोलीस अंमलदार व हवालदारांची ड्यूटी आठ तासांवरून १२ तासांवर करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर राहणार असून रविवारी साप्ताहिक सुटी घेणार नाही. त्यांना आवश्यकतेनुसार साप्ताहिक सुट्टी दिली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.


दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक करून तोडफोडही केली आहे.

Comments
Add Comment

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल

मुंबई : युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री

'सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तात्काळ निकाली काढा'

मुंबई : गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई

बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला अजित पवारांचे नाव

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व

दुबईत अडकलेल्या मराठी जनांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिला आधार दुबईतील बृहनमहाराष्ट्र