अपात्रतेची नोटीस, गटनेते पद निवडी विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. याचबरोबर विधानसभेत शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून त्यांच्याजागी अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. या दोन विषयांना शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उद्या, सोमवारी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या सुनावणी होणार आहे.


शिंदे गटाचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विनंतीवरून विधानसभेच्या उपसभापतींनी शिंदे यांची या पदावरून हकालपट्टी केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उपसभापतींनी किमान सात दिवसांची नोटीस द्यायला हवी होती. विधानसभेत शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही आमदाराला शिवसेना गटनेते पदी नियुक्ती किंवा प्रतोद नियुक्ती करणे अयोग्य आहे.

शिंदे गटाने या याचिकेची प्रतही मविआ सरकारला देखील पाठविल्याची माहिती आहे. यामुळे न्यायालयाकडून जारी होणाऱ्या नोटीसीचा वेळ वाचू शकेल.
Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण