मायावतींचा मुर्मूं यांना पाठिंबा जाहीर

लखनऊ (हिं.स.) : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी लखनऊ येथे बहुजन समाज पक्ष मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.


मुर्मू यांना दिलेल्या पाठिंब्याचे कारण स्पष्ट करताना मायावती म्हणाल्या की, आम्ही हा निर्णय भाजप, एनडीए किंवा विरोधकांचा विचार करून घेतलेला नाही. आमचा पक्ष, विचारधारा आणि चळवळ डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे बसपा हा दलित चळवळीतून जन्माला आलेला पक्ष आहे. पक्षाची मूळ व्होट बँकही दलित आहे.


एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून येतात. अशा स्थितीत द्रौपदी मुर्मूला पाठिंबा द्यायचा की विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा, या संभ्रमात बसपाही अडकला होता. अखेर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मायावती यांनी जाहीर केला. यासोबतच ओडिशाच्या बिजू जनता दलाने आधीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्सनेही पाठिंबा जाहीर केला आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग तमांग यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. बिहारच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि एलजेपी पक्षानेही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.


विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी समाप्त होत आहे. पुढील महिन्यात देशाला नवीन राष्ट्रपती मिळेल. १५ जून रोजी नव्या राष्ट्रपतींच्या निवडची प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ जून आहे. जर निवडणुकीची वेळ आलीच तर १८ जुलै रोजी निवडणूक होईल आणि २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी