सत्तांतराच्या नाट्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सक्रीय

मुंबई : राज्यात सुरू असणाऱ्या सत्तांतराच्या नाट्यात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची एन्ट्री होणार आहे. कोरोना झाल्याने कोश्यारी यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता ते सक्रीय होत आहेत. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्रीय नेते सक्रीय झाले आहेत, त्यानुसार महाराष्ट्रात लवकरच सत्तांतराची नांदी पाहायला मिळू शकते. कायदेशीर लढाया आणि घटनात्मक पेच मार्गी लावण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विशेष भूमिका निभावणार आहेत.


सध्या शिंदे यांनी माघार घेण्यास नकार दर्शवल्यामुळे शिवसेना कोणाची हा पेच अद्याप कायम आहे. शिवसेनेने १६ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिल्याने संपूर्ण मंत्रिमंडळालाच घटनात्मक पेचाला सामोरे जावे लागू शकते.


विधानपरिषदेच्या निकालानंतर ४१ आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने राज्यातील मविआ सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आठवडाभरात दोनदा दिल्ली गाठत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेत चर्चा केली आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटाने त्यांच्या गटाचे नाव निश्चित केले असून, आता हा सर्व वाद कायद्याच्या आणि घटनेच्या पेचात अडकणार आहे. त्यात राज्यातील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांनीदेखील बैठकांमागे बैठका घेण्याचे सत्र चालू केले असून, शिंदे गटाकडून संध्याकाळपर्यंत मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो