'वीएल-एसआरएसएएम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (हिं.स.) : ओडीशाच्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून ‘डीआरडीओ’ आणि भारतीय नौदलाने आज, शुक्रवारी भारतीय नौदलाच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या व्हर्टिकल लॉन्च क्षेपणास्त्राची (व्हीएल -एसआरएसएएम) यशस्वी घेतली.


एल-एसआरएसएएम, हे क्षेपणास्त्र जहाजातून चालवली जाणारी एक शस्त्र प्रणाली आहे, जवळच्या पल्ल्यातील सागरी धोक्यासह विविध हवाई धोक्यांना नष्ट करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. रडारवर दिसू नये अशी यंत्रणा असलेल्या हवाई धोक्यांचाही यात समावेश आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीच्या प्रक्षेपणादरम्यान, हवाई धोका म्हणून सोडण्यात आलेल्या एका अतिजलद विमान प्रतिकृतीचा या क्षेपणास्त्र प्रणालीने यशस्वरीत्या वेध घेतला. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्राद्वारे तैनात केलेल्या अनेक मार्ग निरीक्षण साधनांचा वापर करून निकोप स्थिती मापदंडांसह प्रक्षेपकाच्या उड्डाण मार्गाचे परीक्षण करण्यात आले. डीआरडीओ आणि भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चाचणी प्रक्षेपणाचे निरीक्षण करण्यात आले.


या यशस्वी प्रक्षेपण चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि उद्योगांचे अभिनंदन केले आहे. या प्रणालीने एक कवच प्रदान केले असून ते हवाई धोक्यांपासून भारतीय नौदलाच्या जहाजांची संरक्षण क्षमता आणखी वाढवेल, असे ते म्हणाले. तर नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी, व्हीएल-एसआरएसएएमच्या यशस्वी प्रक्षेपण चाचणीबद्दल भारतीय नौदल आणि डीआरडीओची प्रशंसा केली आहे आणि ही स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केल्यामुळे भारतीय नौदलाची संरक्षणात्मक क्षमता आणखी बळकट होईल, असे त्यांनी सांगितले.


संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी यशस्वी प्रक्षेपण चाचणीत सहभागी चमूची प्रशंसा केली. या चाचणीने भारतीय नौदलाच्या जहाजांवर स्वदेशी शस्त्र प्रणालीचे एकीकरण सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले. हे भारतीय नौदलाचे बळ अधिकाधिक वाढवणारे ठरेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान