आमदार शिरसाटांचे मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र

गुवाहाटी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमदारांना केलेल्या आवाहनाला औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी अनावृत पत्राच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. खरमरीत सदराज मोडणारे हे पत्र स्वतः एकनाथ शिंदे यांनी जारी केलेय. या पत्रातून शिवसेनेच्या आमदारांची व्यथा मांडण्यात आलीय.


https://twitter.com/mieknathshinde/status/1539863093571792896

या पत्रात शिरसाट म्हणाले की, तुम्ही वर्षा बंगला सोडताना झालेली गर्दी पाहून समाधान वाटले. गेली अडीच वर्षे ही दारे शिवसेनेच्या आमदारांसाठी बंद होती. जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना डावलून तुमच्या भोवती जमलेल्या तथाकथित चाणक्यांचे ऐकले जात होते. ते बडवे आम्हाला डावलून निवडणुकांची व्यूहरचना आखायचे. तुम्ही कधी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर गेलाच नाहीत. त्यामुळे वर्षा निवासस्थानी येऊन भेटण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला प्रवेश नसायचा. अनेक तास वाट पाहूनही तुमच्या भोवतीचे बडवे आम्हाला भेट नाकारत होते. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुमची सहज भेट घेत असत. त्या भेटीचे सोशल मिडीयावर फोटो देखील टाकायचे. आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का? हा आमचा सवाल आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची दारे आमच्यासाठी उघडी होती. मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घ्यायला लावला असा प्रश्न शिरसाटांनी विचारलाय.


हिंदुत्व, अयोध्या राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना ? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखले ? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही? असा सवालही शिरसाट यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

Comments
Add Comment

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील