महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक असे काही नाही - उदयनराजे

  60

नवी दिल्ली : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही? यावरुन सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मला धक्कादायक असे काही वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


गेल्या दोन वर्षांपासून ही खदखद चालूच होती. मुळात आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्यावेळेस एका विचाराने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात, त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कुठल्या ताकदीची, आमिष दाखवण्याची गरज नाही. पण ज्यावेळी लोक सत्ता स्थापन करण्यासाठी जातात, वेगवेगळ्या विचारांचे लोक, पक्ष जेव्हा एकत्र येतात, केवळ त्यांचे उद्दिष्ट काय असते.. सत्ता स्थापन करण हे असते. सत्ता स्थापन त्यांनी केली. विचारसरणी वेगळी असल्यामुळे या लोकांना एकत्र ठेवणे तारेवरची कसरत करावी लागली, असे उदयनराजे भोसले म्हणाले. ती वेगवेगळ्या विचाराचे असल्यामुळे फार काळ एकत्र राहत नाही आणि त्यातूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.


खरेतर हे लोक ज्यावेळेस एकत्र आले होते. त्यावेळेस विचार करायला हवा होता, की हे किती दिवस टिकणार? लोक आज बोलवून दाखवतात लोकांना पक्षश्रेष्ठींकडून वेळ दिला जात नाही. त्याच बरोबर तुमची कामं होत नाही. मग असे होत असताना आज आमदार, खासदारकीचा पाच वर्षांचा कालावधी असतो. स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचा कालावधी संपला आहे. या दोन-चार महिन्यात सर्वांना सामोरे जावे लागेल. मग अशा वेळेस विचार केल्यास शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मतदारसंघातील विरोधक राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. त्यामुळे ही समीकरणे जुळवली गेली आहेत, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक