नक्षल हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद

नवी दिल्ली (हिं.स.) : छत्तीसगड येथे मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये २ सहायक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहेत. तर या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत.


यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. या कामावरील लोकांना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान सुरक्षा प्रदान करतात. नौपाडा परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमाराला सीआरपीची टीम या भागात सुरक्षा प्रदान करण्यासाठी निघाली असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला.


नक्षलवाद्यांनी क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे एएसआय शिशुपाल सिंग, एएसआय शिव लाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग शहीद झालेत. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या काऊंटर अटॅकमुळे नक्षलवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. दरम्यान मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सोमवारी २० जून रोजी सुरक्षा दलांनी ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस असेले नक्षलवादी ठार झाले होते.

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या गाडीवर भीषण हल्ला; दोन जवान शहीद, पाच जखमी

इंफाळ, मणिपूर: मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात आज (१९ सप्टेंबर २०२५) सायंकाळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी आसाम

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप नवी

अमेरिकेतली धक्कादायक घटना, पोलीस गोळीबारात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील ३२ वर्षांच्या मोहम्मद निजामुद्दीनचा अमेरिकेत स्थानिक पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल