नक्षल हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद

  73

नवी दिल्ली (हिं.स.) : छत्तीसगड येथे मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये २ सहायक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहेत. तर या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत.


यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. या कामावरील लोकांना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान सुरक्षा प्रदान करतात. नौपाडा परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमाराला सीआरपीची टीम या भागात सुरक्षा प्रदान करण्यासाठी निघाली असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला.


नक्षलवाद्यांनी क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे एएसआय शिशुपाल सिंग, एएसआय शिव लाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग शहीद झालेत. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या काऊंटर अटॅकमुळे नक्षलवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. दरम्यान मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सोमवारी २० जून रोजी सुरक्षा दलांनी ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस असेले नक्षलवादी ठार झाले होते.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व