नक्षल हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद

  76

नवी दिल्ली (हिं.स.) : छत्तीसगड येथे मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये २ सहायक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहेत. तर या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत.


यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. या कामावरील लोकांना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान सुरक्षा प्रदान करतात. नौपाडा परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमाराला सीआरपीची टीम या भागात सुरक्षा प्रदान करण्यासाठी निघाली असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला.


नक्षलवाद्यांनी क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे एएसआय शिशुपाल सिंग, एएसआय शिव लाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग शहीद झालेत. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या काऊंटर अटॅकमुळे नक्षलवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. दरम्यान मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सोमवारी २० जून रोजी सुरक्षा दलांनी ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस असेले नक्षलवादी ठार झाले होते.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.