नक्षल हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद

नवी दिल्ली (हिं.स.) : छत्तीसगड येथे मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये २ सहायक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहेत. तर या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत.


यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर रस्ते बांधणीचे काम सुरू आहे. या कामावरील लोकांना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान सुरक्षा प्रदान करतात. नौपाडा परिसरात मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमाराला सीआरपीची टीम या भागात सुरक्षा प्रदान करण्यासाठी निघाली असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला.


नक्षलवाद्यांनी क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे एएसआय शिशुपाल सिंग, एएसआय शिव लाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग शहीद झालेत. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या काऊंटर अटॅकमुळे नक्षलवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. दरम्यान मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सोमवारी २० जून रोजी सुरक्षा दलांनी ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात एकूण ३० लाख रुपयांचे बक्षीस असेले नक्षलवादी ठार झाले होते.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय