सीमा दाते
मुंबई : जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी हवा तसा पाऊस पडलेला नाही. यामुळेच मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये एकूण साठ्याच्या केवळ १०.४५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्यावर्षी वर्षभर पुरेल असा पाणी साठा होता. मात्र यंदा जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात धरणक्षेत्रात पाऊस झाला नसल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. सध्या १०.४५ इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे, तर सर्व तलावांमध्ये १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर पाण्यापैकी १५ हजार १२३ कोटी लिटर म्हणजेच एकूण साठ्याच्या केवळ साडेदहा टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. दरम्यान दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास मुंबईकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळू शकते.
मुंबईला दररोज अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.
मुंबईकरांसाठी वर्षभर १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. सध्या या धरणांमध्ये १५ हजार १२३ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे.
गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…
बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…
तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…
आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…
एक दिव्यांगासह ३०० सायकल वारकऱ्यांचा सहभाग नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी…
मुंबई : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर खेचून आणलेल्या टी-२० विश्वचषकामुळे (T20 World cup) देशभरात आनंदाची…