मुंबईवर पाणीकपातीचे संकट

सीमा दाते


मुंबई : जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी हवा तसा पाऊस पडलेला नाही. यामुळेच मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये एकूण साठ्याच्या केवळ १०.४५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे.


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्यावर्षी वर्षभर पुरेल असा पाणी साठा होता. मात्र यंदा जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात धरणक्षेत्रात पाऊस झाला नसल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. सध्या १०.४५ इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे, तर सर्व तलावांमध्ये १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर पाण्यापैकी १५ हजार १२३ कोटी लिटर म्हणजेच एकूण साठ्याच्या केवळ साडेदहा टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. दरम्यान दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास मुंबईकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळू शकते.




मुंबईला दररोज अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.


मुंबईकरांसाठी वर्षभर १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. सध्या या धरणांमध्ये १५ हजार १२३ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे.

Comments
Add Comment

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी