आसाममध्ये पावसाचा कहर

आसाम (वृत्तसंस्था) : आसाममध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे पाच हजारांपेक्षा जास्त गावे पाण्याखाली गेली आहेत. पूरस्थितीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. दरम्यान बचावकार्यासाठी गेलेले चार पोलीस वाहून गेले. या पावसाचा ३२ जिल्ह्यांना फटका बसला आहे. नागरिकांप्रमाणे जनावरांचेही प्रचंड हाल होत आहेत. आसाममधील ४२ लाख लोकांना या पूरस्थिताचा फटका बसला आहे.


बचावकार्यादरम्यान आलेल्या पोलिसांपैकी चार पोलीस पुरात वाहून गेले असून यापैकी एका पोलिसाचा मृतदेह सापडला, तर अन्य तीन पोलीस बेपत्ता आहेत. पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणे देखील कठीण झाले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरू आहे.


या पुरामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे संसार उघड्यावर पडले आहेत. नागरिकांची तारांबळ उडून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकजण रस्त्यावर आले आहेत. बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचरा, दारंग, धेमाजी, भुबरी, कार्बी, कोकराजसह अनेक जिल्ह्यातील परिस्थिती हालाखीची झाली आहे. लष्कराच्या जवानांचे बचाव आणि मदतकार्य सुरूच असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे.

Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष