कोणी कितीही पावसात भिजले, तरी त्याचा परिणाम होईल असे नाही

मुंबई : राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची आज निवडणूक होत आहे. दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की, भाजपच्या हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधी नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज कुणीही पावसात भिजले तरी निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असे म्हणत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला.


पडळकर यांनी आज सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते मतदानानंतर विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते. कोणी कितीही पावसात भिजले, तरी त्याचा परिणाम होईल असे आज वाटत नाही. भारतीय जनता पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. २०१९ ला राज्यातील जनतेने भाजप-सेना युतीचे १६१ आमदार निवडून दिले होते. पण, विश्वासघात झाला. पाठीत खंजीर खुपसून यांनी सरकार स्थापन केले. पण, आता आमदारांना आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे, अस पडळकर म्हणाले.


अपक्ष आमदारांची मविआने अनेकदा अब्रू घालवली. ते लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. लोकांमध्ये या आमदारांविषयी मत कलुषित करण्याचा प्रयत्न झाला आहे. ते सर्व आमदार आजच्या दिवशी मतदानातून नक्कीच व्यक्त होतील,” असंही पडळकरांनी नमूद केले.


भाजपाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, १७० आमदार असणाऱ्यांची बैठक पहाटे संपल्याचे माध्यमातून ऐकले. भाजपाची बैठक रात्री साडेआठ वाजताच संपली. १७० आमदारांवाले पहाटेपर्यंत कशासाठी जागे आहेत? म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येत आहे की त्यांच्यात काहीतरी गोंधळ उडाला आहे.

Comments
Add Comment

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड