ठाकरे सरकारला धक्का महाविकास आघाडीची तब्बल वीस मते फुटली

  90

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा उडवला आहे. राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी दहा मते जास्त मिळवून भाजपच्या पाचही उमेदवारांनी बेगमी केली. भाजपचे ११३ आमदारांचे संख्याबळ असताना ११३ मते मिळवून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मते आपल्याकडे वळवली.


विधान परिषदेच्या आज झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला. राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना भाजपने पहिल्या पसंतीची ३० मते दिली. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना १७ मते पहिल्या पसंतीची मिळाली. याशिवाय प्रवीण दरेकर यांना २९, उमा खापरे यांना २७ अशी पहिल्या पसंतीची मते मिळाली. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे चारही उमेदवार प्रत्येकी २६ मते मिळवून विजयी झाले. तरी मते फुटल्याचे शल्य या पक्षांना झेलावे लागणार आहे.


शिवसेनेकडे अपक्षांसह पहिल्या पसंतीची सुमारे ६३ मते असताना आणि कॉंग्रेसकडे ४४ असताना कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची कोट्याइतकी मते मिळू शकली नाही. ही बाब या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक बाब ठरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रामराजे यांना २९ आणि एकनाथ खडसे यांना २८ मते पहिल्या मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले उमेदवार सहज निवडून आणले.


शिवेसनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना कोट्याइतकी म्हणजे प्रत्येकी २६ मते मिळाली. त्यामुळे ते देखील विजयी झाले. पण शिवसेनेच्या उमेदवारांना या पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवणे अपेक्षित होते. कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २२ व भाई जगताप यांना १९ पहिल्या पसंतीची मते मिळाली. याचा अर्थ कॉंग्रेसकडे ४४ मते असतानाही तीन मते फुटल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस