आमदार काय मच्छिबाजार वाटला का, हितेंद्र ठाकूरांचा राऊतांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक सुरू आहे. सायंकाळी ४ वाजता सर्व आमदारांनी आपले मत टाकले आहे. यानंतर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.


राज्यसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी आमदार फुटल्याबाबत तीव्र आरोप केले होते. याबाबत विचारले असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, या निवडणुकीचा निकाल लागला की कळेल, कोण फुटले आणि कोण नाही, असे सांगत जो निवडणुकीत हरतो, तो असे खापर दुसऱ्यांवर फोडत असतो. आमदार काय मच्छिबाजार वाटला का, अशी विचारणा केली.


तर, तुमच्यात हिंमत असेल, तर सगळ्यांसमोर एकदा काय ते जाहीर करून टाका. संजय राऊत यांनी त्यांना अपेक्षित मते मिळाली नाही, त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. माझ्यावर आरोप केले नव्हते, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम