'अग्निविरां'ना महिंद्रा ग्रुपमध्ये देणार नोकरी

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे.


तिन्ही सैन्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेतही काही उद्योगपतींनी अग्निशमन दलाला नोकऱ्यांचे आश्वासन दिल्याचे नमूद केले होते. आता यामध्ये आनंद महिंद्रा यांचे पण नाव समोर आले आहे.


आनंद महिंद्रा यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट केले आहे. सैन्यात ४ वर्षे अग्निवीर म्हणून काम केल्यानंतर अशा तरुणांना महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरी देणार असल्याचे म्हटले आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये अग्निवीर योजनेंतर्गत महिंद्रा ग्रुपमध्ये तरुणांना नोकऱ्या देणार असल्याचे लिहिले आहे.


https://twitter.com/anandmahindra/status/1538688925509763075

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, अग्निपथ कार्यक्रमावर झालेल्या हिंसाचारामुळे दु:ख होत आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो की, अग्निवीरांनी अग्निवीरांना मिळालेली शिस्त आणि कौशल्य ही रोजगाराची गुरुकिल्ली आहे. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना भरती करण्याच्या संधीचे स्वागत करतो असे त्यांनी नमूद केलेय.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली