काश्मीर खोऱ्यात २४ तासांत ७ दहशतवादी ठार

कुपवाडा (हिं.स.) : काश्मीर खोऱ्यात ३० जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेत अडथळा निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली आहे. खोऱ्यात गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांनी तीन वेगवेगळ्या चकमकीत ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यासह या वर्षात आतापर्यंत एकूण ११४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत सात दहशतवाद्यांना ठार केले असून त्यात कुपवाडामध्ये ४, कुलगाममध्ये दोन आणि पुलवामामध्ये एकाचा समावेश आहे. यादरम्यान सुरक्षा दलांनी कुपवाडामध्ये ४ दहशतवाद्यांनाही अटक केली आहे. मारले गेलेल्या आणि पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे.


काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब भागात रविवारी दुपारपासून सोमवार सकाळपर्यंत चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाबमध्ये ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी आहे. त्यांनी सांगितले की, लोलाबमध्ये सुरक्षा दलांनी शौकत अहमद शेख या दहशतवाद्यालाही अटक केली होती, त्यानेच चौकशीत कुपवाडा येथे हे दहशतवादी लपल्याची माहिती दिली होती.


यासंदर्भात आयजीपी म्हणाले की, रविवारी सकाळी कुलगामच्या धिपोरा भागात पहिल्यांदा चकमक सुरू झाली. रविवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दलाच्या कारवाईदरम्यान सोमवारी सकाळी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले, तो स्थानिक असल्याचे सांगितले जातेय. पुलवामामध्ये सुरक्षा दलांचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. ते म्हणाले की, गेल्या दहा दिवसांत सुरक्षा दलांनी २४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या वर्षात आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात ३२ परदेशी दहशतवाद्यांसह एकूण ११४ दहशतवादी मारले गेले आहेत.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च