काश्मीर खोऱ्यात २४ तासांत ७ दहशतवादी ठार

  96

कुपवाडा (हिं.स.) : काश्मीर खोऱ्यात ३० जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेत अडथळा निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली आहे. खोऱ्यात गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांनी तीन वेगवेगळ्या चकमकीत ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यासह या वर्षात आतापर्यंत एकूण ११४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत सात दहशतवाद्यांना ठार केले असून त्यात कुपवाडामध्ये ४, कुलगाममध्ये दोन आणि पुलवामामध्ये एकाचा समावेश आहे. यादरम्यान सुरक्षा दलांनी कुपवाडामध्ये ४ दहशतवाद्यांनाही अटक केली आहे. मारले गेलेल्या आणि पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे.


काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब भागात रविवारी दुपारपासून सोमवार सकाळपर्यंत चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाबमध्ये ठार झालेल्या चार दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी आहे. त्यांनी सांगितले की, लोलाबमध्ये सुरक्षा दलांनी शौकत अहमद शेख या दहशतवाद्यालाही अटक केली होती, त्यानेच चौकशीत कुपवाडा येथे हे दहशतवादी लपल्याची माहिती दिली होती.


यासंदर्भात आयजीपी म्हणाले की, रविवारी सकाळी कुलगामच्या धिपोरा भागात पहिल्यांदा चकमक सुरू झाली. रविवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दलाच्या कारवाईदरम्यान सोमवारी सकाळी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले, तो स्थानिक असल्याचे सांगितले जातेय. पुलवामामध्ये सुरक्षा दलांचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. ते म्हणाले की, गेल्या दहा दिवसांत सुरक्षा दलांनी २४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या वर्षात आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात ३२ परदेशी दहशतवाद्यांसह एकूण ११४ दहशतवादी मारले गेले आहेत.

Comments
Add Comment

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.