अचानक लागलेल्या आगीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्पाईसजेट या विमान वाहतूक कंपनीच्या एका विमानाला अचानक आग लागल्यामुळे बिहार पटणा येथील बिहता विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण १८५ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी विमानातून सुखरूप बाहेर आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


स्पाईस जेटच्या बोईंग ७२७ या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानाला मागील डाव्या बाजूने अचानक आग लागली. ही आग फुलवारी शरीफ या भागातील लोकांनी पाहिली. या लोकांनी विमानाला आग लागल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. पटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी तशी माहिती दिली.


विमानामध्ये तांत्रित बिघाड झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती असल्याचेही सिंह यांनी सांगितले. या विमानातील सर्व १८५ प्रवासी सुखरूप आहेत. दिल्ली येथून १२.३० वाजता या विमानाने उड्डाण केले होते. या विमानाला उंची गाठता येत नव्हती. इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी हे विमान जवळपास २५ मिनिटे हवेतच होते. विमानाने लँडिंग केल्यानंतर विमानतळाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी विमानाकडे धाव घेतली. तसेच त्यांनी प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर