भिवंडीत पिण्याच्या पाण्याच्या ४९०० सीलबंद बाटल्या जप्त

  146

भिवंडी (हिं.स.) : बीआयएस अर्थात भारतीय मानके संस्थेने ठाण्यातील भिवंडी येथून पिण्याच्या पाण्याच्या ४९०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांवर बीआयएसच्या मानक चिन्हाचा बेकायदेशीर वापर केलेला होता. आय एस १४५४३:२०१६ नुसार, ठाण्यात भिवंडी येथे पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्यांवर बीआयएसच्या प्रमाणनाचे चिन्ह बेकायदेशीर पद्धतीने वापरले जात आहे का, याचा तपास करण्यासाठी बीआयएसच्या मुंबई पथकाने भिवंडीत सक्तीचा तपास आणि जप्तीची धाड टाकली.


मेसर्स बालाजी एन्टरप्रायझेस, H.No- 611, वेहेळे, पो.- पिंपळास, माणकोली मार्ग, ता. भिवंडी, जि.ठाणे ४२१३११ मुंबई- ४००७०५ येथे, बीआयएसकडून वैध परवाना ना घेताच बीआयएस प्रमाणन चिह्नाचा बेकायदेशीर वापर करून, बीआयएस कायदा, २०१६ च्या कलम १७ चे उल्लंघन केले जात असल्याचे या धाडीच्या वेळी निदर्शनास आले.


या जप्तीच्या कारवाईच्या वेळी पिण्याच्या पाण्याच्या ५०० मिलीच्या अंदाजे ४९०० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या सीलबंद बाटल्यांवर बीआयएस प्रमाणन चिन्ह अंकित केलेले होते, मात्र ते या कंपनीचे नव्हते, असे आढळून आले. सदर अपराधाबद्दल न्यायालयात खटला भरण्यासाठी पुढील कारवाई करण्यात येत आहे.


ही तपास आणि जप्ती कारवाई बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी- 'शास्त्रज्ञ-सी तथा उपसंचालक टी अर्जुन आणि शास्त्रज्ञ-बी तथा सहसंचालक विवेक रेड्डी यांनी केली.


कोणत्याही उत्पादनावरील आयएसआय चिह्नाचा गैरवापर कळवा-


बीआयएस प्रमाणन चिन्हाचा गैरवापर हा 'बीआयएस कायदा, २०१६' अन्वये दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान २,००,००० रुपयांचा दण्ड किंवा दोन्ही अशा स्वरूपाच्या शिक्षेस पात्र आहे. अनेकदा असे निदर्शनास आले आहे की, मोठ्या प्रमाणात नफा कमावण्यासाठी आयएसआयच्या बनावट चिह्नाचा वापर करून उत्पादने तयार केली जातात आणि ग्राहकांना विकली जातात. यास्तव, खरेदीपूर्वी त्या वस्तूवरीलआयएसआय चिह्नाची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती सर्वांना करण्यात येत आहे. यासाठी बीआयएसच्या पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी- http://www.bis.gov.in .


एखाद्या उत्पादनावर आयएसआय चिह्नाचा गैरवापर/बेकायदेशीर वापर होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी ती गोष्ट- 'प्रमुख, MUBO-II, पश्चिम प्रादेशिक कार्यालय, बीआयएस, दुसरा मजला, NTH (WR), भूखंड क्र. F-10, एमआयडीसी, अंधेरी, मुंबई-४०००९३' - येथे कळवावी. तसेच hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर इ-मेल करूनही अशा तक्रारी करता येतील. या माहितीचा स्रोत/ माहिती पुरवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

Comments
Add Comment

संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थीमधील फरक काय आहेत

मुंबई: हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी

टाटा समुहाच्या ट्रेंट लिमिटेडचा 'बर्न्ट टोस्ट' लाँच भारताच्या पुढच्या पिढीसाठी नवीन फॅशन 'व्हॉइस'

मुंबई: सणासुदीच्या मुहूर्तावर टाटा समुहाची लाईफस्टाईल कंपनी ट्रेंट लिमिटेडने (Trent Limited) भारतातील पुढील पिढीतील

शाकाहारी लोकांसाठी 'ड' जीवनसत्वाची कमतरता भरून काढणारे पदार्थ

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी 'ड' जीवनसत्व (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते. शरीरातील हाडांची मजबुती,

गोविंदा फक्त माझाच! घटस्फोटाच्या चर्चांना सुनीता आहूजा यांनी दिला पूर्णविराम

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात घटस्फोटाची

दक्षिण कोरियात शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी

सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा

Horoscope: सप्टेंबर महिन्यात ‘या’ ४ राशींचे नशीब पालटणार!

नवी दिल्ली: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर २०२५ महिना अनेक र