खरा शिवसैनिक कधीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान करणार नाही -मुनगंटीवार

नागपूर : आम्ही चमत्कारासाठी नव्हे तर विजयासाठी विधानपरिषद निवडणूक लढवत आहोत. विचारपूर्वकच राज्यसभेत तीन उमेदवार दिले. आमदारांच्या सदसद्विवेकबुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. विधानपरिषदेचे आम्ही चमत्काराससाठी नाही तर पाचवा उमेदवार दिला नाही तर त्याचे नियोजनपूर्व आम्ही या निवडणुकीची तयारी केली आहे. भाजपचा पाचवाही उमेदवार निवडणून येईल, असा विश्वास भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते नागपुरात विभागीय भाजपकार्यलयात माध्यमांशी बोलत होते.


शिवसेनेचे आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असतील तर त्यांचे काही चुकले नाही. शिवसेनेच्या आमदाराना जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे. शिवसेनेचा सर्व आमदारांना आवाहन आहे. त्यांनी १९६६ मध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषण केले होते ते एकदा ऐकावे. ते एकदा ऐकले तर शिवसेनेचा खरा आमदार कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकत नाही. ज्यांना खुर्चीवर प्रेम आहे जे बाळासाहेबांचे विचारांना विसरले असतील तेच मात्र मतदान करतील, असा टोलाही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला.


https://twitter.com/SMungantiwar/status/1538430730862473222

शिवाय आमदारांच्या सद्सद्विवेक बुद्धीला चोऱ्यामाऱ्या म्हणने, डॉक्टरपेक्षा कंपाउंडर मोठा म्हणने, पाप केल्याने कोरोना होतो असे म्हणने, भाजप जिंकली मात्र त्यांचा विजय झाला नाही असे म्हणने, या सर्वाबद्दल हजारो वर्षांच्या संशोधनानंतर उत्तर सापडतील अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली.

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध