HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे नुकसान होईल. तुम्ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर आताच सावध व्हा! ज्यांनी ही नंबरप्लेट बसवून घेतली नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.


सरकारने ही नंबर प्लेट बसवून घेण्याची ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख दिली होती, मात्र असं असूनही अनेक गाडयांना HSRP नंबर प्लेट नसल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात येताच त्यांनी आता कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे.



१८ फेब्रुवारीपासून होणार कारवाई:


वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले होते. अनेकांनी अजूनही हे काम केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूली केली जाणार आहे. १८ फेब्रुवारीपासून वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत परिवहन आयुक्त विवेक भिमनगर यांनी दिले आहेत.


पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लाखो वाहनधारकांनी अजूनही नंबरप्लेट बसवलेली नाही. जवळपास २४ लाखांहून अधिक वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची होती. मात्र, फक्त साडेआठ लाख वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे. जवळपास ६५ टक्के वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळेच हा कारवाईचा बडगा उचलला आहे.



किती भरावा लागणार दंड?


एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास तुम्हाला रोख रक्कम दंड भरावा लागणार आहे. १,००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंतचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो.

Comments
Add Comment

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत