HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे नुकसान होईल. तुम्ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर आताच सावध व्हा! ज्यांनी ही नंबरप्लेट बसवून घेतली नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.


सरकारने ही नंबर प्लेट बसवून घेण्याची ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख दिली होती, मात्र असं असूनही अनेक गाडयांना HSRP नंबर प्लेट नसल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात येताच त्यांनी आता कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे.



१८ फेब्रुवारीपासून होणार कारवाई:


वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले होते. अनेकांनी अजूनही हे काम केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूली केली जाणार आहे. १८ फेब्रुवारीपासून वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत परिवहन आयुक्त विवेक भिमनगर यांनी दिले आहेत.


पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लाखो वाहनधारकांनी अजूनही नंबरप्लेट बसवलेली नाही. जवळपास २४ लाखांहून अधिक वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची होती. मात्र, फक्त साडेआठ लाख वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे. जवळपास ६५ टक्के वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळेच हा कारवाईचा बडगा उचलला आहे.



किती भरावा लागणार दंड?


एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास तुम्हाला रोख रक्कम दंड भरावा लागणार आहे. १,००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंतचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या (Murder) प्रकरणात

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)