मुंबईची अंतिम फेरीत धडक

बंगळूरु (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश विरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहीला. त्यामुळे सर्वाधिक वेळा विजेतेपद उंचावलेल्या मुंबईने यंदा पुन्हा एकदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. यशस्वी जयस्वाल, हार्दिक तमोरे आणि अरमान जाफर यांची शतके मुंबईच्या यशासाठी मोलाची ठरली. यशस्वी जयस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.


उत्तर प्रदेशविरुद्धचा उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल लागला नाही. परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला पुढे चाल देण्यात आली. मुंबईने अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यांच्यासमोर आता मध्यप्रदेशचे आव्हान आहे. अंतिम फेरीचा हा सामना बुधवारी बंगळूरुमध्येच होणार आहे.


मुंबईच्या विजयात युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने चमक दाखवली. यशस्वीने दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी खेळली. पहिल्या डावात त्याने १०० धावा केल्या, तर दुसऱ्या डावात यशस्वीने १८१ धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्यामुळे विजय मुंबईच्या आवाक्यात आला. त्याला हार्दिक तामोरे आणि अरमान जाफर यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईने चौथ्या दिवसाअखेर भक्कम अशी आघाडी घेतली होती. चौथ्या दिवसाअखेर मुंबईकडे ६६२ धावांची आघाडी होती. त्यामुळे मुंबईचा विजय जवळपास निश्चितच मानला जात होता.


यशस्वी जयस्वाल (१८१ धावा) आणि अरमान जाफर (१२७ धावा) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या मोठ्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील दुसऱ्या डावात ६६२ धावांची डोंगराएवढी आघाडी घेतली होती.


अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक वेळा विजेतेपद उंचावलेल्या मुंबईने यंदा आपला धमाका कायम ठेवला आहे. उत्तर प्रदेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि अरमान जाफर या जोडीने कमालीची फलंदाजी केली. जयस्वालने १८१ धावांची मॅरेथॉन खेळी खेळली. त्याला अरमान जाफरने चांगली साथ दिली. जाफरने १२७ धावांची खेळी खेळली. मुंबईने चौथ्या दिवसाअखेर ४ फलंदाजांच्या बदल्यात ४४९ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबईने ६६२ धावांची भक्कम आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात उत्तर प्रदेशचा प्रिंस यादव बळी मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने दोन बळी मिळवले. शिवम मावी आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.


दरम्यान मुंबईने उत्तर प्रदेशला पहिल्या डावात १८० धावांवर सर्वबाद केले. तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, तनुष कोटीयन या मुंबईच्या त्रिकुटाने उत्तर प्रदेशच्या फलंदाजीचा कणाच मोडला. या तिघांनीही प्रत्येकी ३ फलंदाज बाद करत उत्तर प्रदेशला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. धवल कुलकर्णीने एक बळी मिळवला. त्यामुळे उत्तर प्रदेशचा पहिला डाव अवघ्या १८० धावांवर आटोपला होता.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या