महाआघाडीतील असंतोष भाजपच्या पथ्यावर

Share

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाआघाडीतील घटक पक्षांमध्ये असंतोष व परस्परांवरील अविश्वास वाढीस लागल्याने ही बाब भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. सोमवारी (२० जून) होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत फडणवीस यांनी अपक्ष आमदारांसह इतरही आमदारांशी संपर्क अभियान गतीमान केले आहे. महाआघाडीतील असंतोषामुळे व अंर्तगत कुरघोड्यांमुळे या निवडणूकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास फडणवीस व पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अडीच वर्षांच्या कालावधीत मतदारसंघातील कामे न झाल्याने व संपर्क ठेवण्यात सत्ताधाऱ्यांनी उदासीनता दाखविल्याची नाराजी अपक्ष आमदारांकडून उघडपणे व्यक्त केली जात असल्याने महाआघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीतही भाजपने राज्यसभेप्रमाणे एक उमेदवार जास्त दिला आहे. त्यामुळे मविआची डोकेदुखी वाढली आहे. भाजपकडून पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनाही विधान परिषदेचे तिकीट मिळाले आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही मविआला पराभूत करण्यासाठी एक-एक अपक्ष आमदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपच्या नेते मंडळींनी कंबर कसली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले मानले जाणारे प्रसाद लाड यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. प्रसाद लाड यांचे सर्वपक्षीयांशी मधूर संबंध आहेत. त्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही जवळचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे या निवडणुकीत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतात. काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यापुढे प्रसाद लाड यांचे कडवे आव्हान उभे राहीले आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

14 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

46 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago