महाआघाडीतील असंतोष भाजपच्या पथ्यावर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाआघाडीतील घटक पक्षांमध्ये असंतोष व परस्परांवरील अविश्वास वाढीस लागल्याने ही बाब भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. सोमवारी (२० जून) होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत फडणवीस यांनी अपक्ष आमदारांसह इतरही आमदारांशी संपर्क अभियान गतीमान केले आहे. महाआघाडीतील असंतोषामुळे व अंर्तगत कुरघोड्यांमुळे या निवडणूकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास फडणवीस व पाटील यांनी व्यक्त केला आहे.


अडीच वर्षांच्या कालावधीत मतदारसंघातील कामे न झाल्याने व संपर्क ठेवण्यात सत्ताधाऱ्यांनी उदासीनता दाखविल्याची नाराजी अपक्ष आमदारांकडून उघडपणे व्यक्त केली जात असल्याने महाआघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीतही भाजपने राज्यसभेप्रमाणे एक उमेदवार जास्त दिला आहे. त्यामुळे मविआची डोकेदुखी वाढली आहे. भाजपकडून पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनाही विधान परिषदेचे तिकीट मिळाले आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही मविआला पराभूत करण्यासाठी एक-एक अपक्ष आमदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपच्या नेते मंडळींनी कंबर कसली आहे.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले मानले जाणारे प्रसाद लाड यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. प्रसाद लाड यांचे सर्वपक्षीयांशी मधूर संबंध आहेत. त्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही जवळचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे या निवडणुकीत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतात. काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यापुढे प्रसाद लाड यांचे कडवे आव्हान उभे राहीले आहे.

Comments
Add Comment

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली