विधान परिषदेसाठी बविआसाठी भाजपची मोर्चेबांधणी

मुंबई : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकूण १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे १० व्या जागेसाठी चुरस असेल. ही जागा जिंकण्यासाठी भाजपने आक्रमकपणे प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे राज्यसभेतील भाजपच्या विजयाचा धुरळा राजकीय मैदानात उडाला असतानाच दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही भाजपने मोट बांधायला सुरुवात केली आहे.


राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर आता भाजपने विधान परिषदेची जोरदार तयारी केली आहे. राज्यसभा निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्षांनी भाजपला साथ दिली. आता त्याचीच पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तीन आमदार असलेल्या बविआला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्व प्राप्त झाले आहे. भाजपकडून सातत्याने बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्याशी भेटीगाठी सुरू असल्याने बविआचा कल भाजपकडे झुकणार असल्याचे बोलले जात आहे.


येत्या २० जूनला १० जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह भाजपने घोडेबाजार होऊ नये म्हणून आमदारांची हॉटेलवारी केली आहे. या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचे मतदान अंत्यंत महत्वाचे मानले जात आहे. तसेच बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतदानाकडेही सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे. हितेंद्र ठाकूर स्वत: आमदार आहेत. त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूरदेखील विधानसभेचे सदस्य आहेत. मात्र ते सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी लवकरात लवकर भारतात परतावे आणि आपल्या बाजूने मतदान करावे यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.


भाजपकडून पाचव्या जागेसाठी प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. लाड यांच्या विरोधात कॉंग्रेसचे उमेदवार भाई जगताप हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतांचा कोटा भरण्यासाठी बविआच्या तीन आमदारांच्या मतांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार हिंतेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी विरारमध्ये दाखल झाले व त्यांनी चर्चा केली. भाजप नेत्यांमध्ये आणि बविआच्या आमदारांमध्ये बंद दाराआड खलबते झाली.


विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मतदान करावे, अशी मागणी हिंतेद्र ठाकूर यांच्याकडे भाजप नेत्यांनी केली आहे. परंतु, आपण कोणाला मतदार करणार आहोत, हे सांगायचे नसते. त्यामुळे आम्हा एकत्र बसून आणि निर्णय घेवू आणि मतदान करु. मत देताना वसई-विरारच्या विकासाचा विचार करणार आहोत, अशी प्रतिक्रिया हिंतेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे बविआची मतदानाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री