सोनिया गांधींची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली (हिं.स.) : कोरोना प्रादुर्भावामुळे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचार करत असलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमित असलेल्या सोनियांच्या नाकातून रक्त वाहू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री यजराम रमेश यांनी दिली.


जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गानंतर १२ जून रोजी सोनिया गांधी यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोनिया गांधी यांना गुरुवारी श्वास घेण्यास त्रास होत होता. नंतर त्यांच्या खालच्या श्वसनमार्गामध्ये बुरशीजन्य संसर्ग झाल्याचे आढळून आले. अशी माहिती जयराम यांनी दिली. तसेच, कोरोनानंतर त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आणखी काही समस्या उद्भवल्या आहेत.


सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. असे जयराम यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली होती. त्यांना काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,