मजबूत अर्थव्यवस्थेसोबत पर्यावरणाचे संरक्षण : नितीन गडकरी

नवी दिल्ली (हिं.स) : परिसंस्था, पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल राखण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.


‘इंडस्ट्रियल डिकार्बोनायझेशन समिट २०२२’(IDS-२०२२)-२०७० पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी आराखडा संबंधी परिषदेचे उदघाटन करताना ते म्हणाले की, विजेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पर्यायी इंधन विकसित करणे आवश्यक आहे. या मुद्द्यांवर विकेंद्रित एकतर्फी दृष्टिकोन देशासाठी लाभदायक नाही, असे गडकरी यावेळी म्हणाले.


आगामी काळात आपल्याला आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचेही संरक्षण करायचे आहे, असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी नमूद केले की, ग्रीन हायड्रोजनला आमचे प्राधान्य आहे, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून आपण बायोमासची उत्पादकता वाढवू शकतो आणि बायोमास वापरून आपण बायो-इथेनॉल, बायो-एलएनजी आणि बायो-सीएनजी निर्माण करू शकतो. मिथेनॉल आणि इथेनॉलच्या वापराने प्रदूषण कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.


गडकरी म्हणाले, की एक केंद्रित आराखडा तयार केला पाहिजे आणि पुरेसे संशोधन केले पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली आयात कमी करून निर्यात वाढवता येईल.

Comments
Add Comment

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी

तेजस्वी यादव विजयी, तर तेजप्रताप पराभूत

पटना : बिहार निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एनडीए २४३ पैकी २०२ जागांसह विक्रमी विजयाकडे वाटचाल करत आहे, तर