ठाण्यात महिला शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

ठाणे : भाजपाने मंगळवारी शिवसेनेला पुन्हा जोरदार धक्का दिला. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर संघटक संध्या सुरेश साळुंखे यांच्या नेतृ्त्वाखाली अनेक महिला शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या कार्याला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून पसंती मिळत असल्यामुळे प्रवेशाची मालिका सुरूच असल्याचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगितले.


भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महिला शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी गटनेते मनोहर डुंबरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनेश जोशी, सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे, मनोहर सुखदरे आदींची उपस्थिती होती. या वेळी काही पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.


भाजपाच्या महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी संध्या साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली. तर माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, शशिकांत नगीन साळवी व निलेश गोवर्धन भगत यांची चिटणीसपदी, गजेंद्र तोमर यांची कार्यकारिणी सदस्यपदी आणि आयटी सेलच्या संयोजकपदी प्रणय गावकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Comments
Add Comment

Kalyan Crime : कल्याण हादरले! १७ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली; तरुण मजुराचा जागीच मृत्यू, तर दुसरा मृत्यूशी देतोय झुंज

कल्याण : कल्याण शहरात एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. येथील विकास

ई-चलन न भरल्यास उमेदवारी अर्ज होणार बाद!

वाहतूक शाखेकडे इच्छुक उमेदवाराने भरले तब्बल दीड लाखांचे ई-चलन ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास

ठाणे ‘सिव्हिल’ने तरुणीला दिले नवे आयुष्य

अपघातग्रस्त तरुणीवर जबड्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी ठाणे : नेरळ परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण