देशातील पहिली खासगी रेल्वे -शिर्डी

नवी दिल्ली : भारत गौरव योजनेंतर्गत देशातल्या पहिल्या खाजगी रेल्वेला मंगळवारी कोइमतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही ट्रेन कोइमतूरहून मंगळवारी निघाली असून, ती गुरुवारी शिर्डीत साईनगरला पोहोचेल. या स्पेशल ट्रेनमधून १५०० प्रवासी प्रवास करू शकतात. दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ बी. गुगनेसन यांनी ही माहिती दिली आहे.


एएनआय या न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, गुगनेसन यांनी सांगितले, की रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला २ वर्षांसाठी लीजवर दिली आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरने कोचच्या सीट्सचे नूतनीकरण केले आहे. या ट्रेनच्या महिन्याला किमान तीन फेऱ्या होतील. या ट्रेनमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण २० कोच आहेत. शिर्डीला पोहोचण्यापूर्वी ट्रेन तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बेंगळुरू, येलाहंका, धर्मावरा, मंत्रालयम रोड आणि वाडी या स्टेशन्सवर थांबेल.


अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, या ट्रेनचे तिकीट दर भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणा-या नियमित रेल्वे तिकीट दरांइतकेच आहेत. तसेच, या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात विशेष व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केली जाईल. ट्रेनची देखभाल हाउसकीपिंग सर्व्हिस प्रोव्हायडर्स करतील. ते संपूर्ण प्रवासादरम्यान ठराविक वेळेनंतर ट्रेनची साफसफाई करतील. तसेच ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.


रेल्वे पोलीस दलासह एक रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर आणि खासगी सुरक्षा कर्मचारीही या रेल्वेत असतील. रिपोर्टनुसार, या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना स्लीपर नॉन एसीसाठी २,५०० रुपये, थर्ड एसीसाठी ५ हजार रुपये, सेकंड एसीसाठी सात हजार रुपये आणि फर्स्ट एसीसाठी दहा हजार रुपये तिकिटासाठी मोजावे लागतील. दरम्यान, या रेल्वे सेवेच्या निषेधार्थ दक्षिण रेल्वे मजदूर युनियनच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गटाने शहरातल्या रेल्वे स्थानकावर निदर्शने केली आहेत.


दक्षिणेतल्या राज्यांना शिर्डीशी जोडणारी ही स्पेशल ट्रेन आहे. या सेवेमुळे तामिळनाडू आणि कर्नाटकमधल्या भाविकांना शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी थेट पोहोचता येईल. शिवाय ही पहिलीच खासगी ट्रेन असल्याने या ट्रेनने प्रवास केल्यानंतर प्रवाशांचे अनुभव आणि भावना काय आहेत, ते येत्या काळात समजण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या