पालिकेने मारले ५ वर्षांत १६ लाख उंदीर

सीमा दाते


मुंबई : मुंबईत उंदरांचा प्रादुर्भाव वाढू नये आणि पावसाळ्यात उंदरांमुळे नागरीकांना आजार होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेकडून उंदीर मारण्याची मोहीम हाती घेतली जाते. गेल्या पाच वर्षांत पालिकेने १६ लाख ४५ हजार १९ उंदीर मारले आहेत. याबाबत माहिती पालिकेने दिली असून पालिकेच्या कीटकनाशक विभागाने ही कामगिरी केली आहे.


दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिका उंदीर मारण्याची मोहीम हाती घेते. पावसाळा सुरू असलेल्या ४ महिन्यांत हे काम शक्य होत नसल्याने पावसाळ्यापूर्वी केले जाते. अनेकदा पावसाळ्यात पाणी साचते. या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. या पाण्यात प्राण्यांचे मलमूत्र मिसळलेले असते. एखाद्या व्यक्तीच्या पायावर जखम झाली असल्यास अशा व्यक्तीला लेप्टो स्पायरेसिसची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लेप्टोचा प्रसार होऊ नये यासाठी पालिकेतर्फे उंदीर मारण्याची मोहीम राबवली जाते.


दरम्यान जानेवारी २०१८ ते मे २०२२ या ५ वर्षांच्या कालावधीत पालिकेच्या कीटकनाशक विभागाने १६ लाख ४५ हजार १९ उंदीर मारले आहेत. कीटकनाशक विभागाकडून ही कामे करण्यात येत असून उंदरांना मारण्यासाठी अॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकल्या जातात. पावसाळ्यात गोळ्यांचा वापर बंद असतो. तर एका उंदराला मारण्यासाठी २२ रुपये देण्यात येतात.


वर्ष - मारलेल्या उंदरांची संख्या


२०१८ - ४,७५,५९०
२०१९ - ४,७७,८८९
२०२० - १,९८,४५१
२०२१ - ३,२३,४९३
जानेवारी ते मे २०२२ - १,६९,५९६

Comments
Add Comment

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदन मुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक

देशभरात वीज होणार स्वस्त

पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा निर्णय जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने

दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची ‘ड्युटी’

शिक्षक संघटनाची नाराजी मुंबई : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना

नीता अंबानी यांनी सुरू केले कर्करोग व डायलिसिस केंद्र

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स