पंतप्रधानांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नात लक्ष घालावे- राज्यपाल

मुंबई (हिं.स.) : औरंगाबाद येथे अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. इथला पाणी प्रश्न बिकट असून पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात ही समस्या निकाली लागेल ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांना पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीची गळ घातली.


राजभवनातील क्रांतीगाथा गॅलरीचा आणि नव्या जलभूषण इमारतीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झाला. याप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यापाल कोश्यारी यांनी सांगितले की, औरंगाबाद दौऱ्यावर असताना स्थानिक नागरिकांनी पाणी प्रश्नाबाबत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. आम्हाला पाच ते सात दिवस पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली होती.


असे अनेक प्रकल्प आहे जे रखडले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे प्रश्न निकाली लागतील. अरुण जेटली सर्वांत अगोदर म्हणाले होते ‘मोदी है तो मुमकीन है’. मी आठ वर्षांनी म्हणतो ‘मोदी है तो मुमकीन है’, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी म्हणाले. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असतानाच राज्यपालांनी या प्रश्नाकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

BMC : मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुंबई : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी

मुंबईतील फोर्ट परिसरात आग; बाबेल हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर...

मुंबई: मुंबईतील फोर्ट परिसरात आग लागली. ही आग ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांवर लागली. तसेच ती हॉटेल इमारतीच्या

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या