पंतप्रधानांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नात लक्ष घालावे- राज्यपाल

मुंबई (हिं.स.) : औरंगाबाद येथे अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. इथला पाणी प्रश्न बिकट असून पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात ही समस्या निकाली लागेल ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांना पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीची गळ घातली.


राजभवनातील क्रांतीगाथा गॅलरीचा आणि नव्या जलभूषण इमारतीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झाला. याप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यापाल कोश्यारी यांनी सांगितले की, औरंगाबाद दौऱ्यावर असताना स्थानिक नागरिकांनी पाणी प्रश्नाबाबत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. आम्हाला पाच ते सात दिवस पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली होती.


असे अनेक प्रकल्प आहे जे रखडले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे प्रश्न निकाली लागतील. अरुण जेटली सर्वांत अगोदर म्हणाले होते ‘मोदी है तो मुमकीन है’. मी आठ वर्षांनी म्हणतो ‘मोदी है तो मुमकीन है’, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी म्हणाले. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असतानाच राज्यपालांनी या प्रश्नाकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.

Comments
Add Comment

Sudhir Mungantiwar : आधी घरचा आहेर, मग 'वर्षा'वर खलबतं! मुनगंटीवार-फडणवीस भेटीत नेमकं काय शिजलं?

चंद्रपूरच्या पराभवानंतर मुनगंटीवारांचे 'बंड' की समन्वय? मुंबई : राज्यात महायुतीचा विजयाचा वारू उधळत असताना

गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा

मुंबई : राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध

राज्यातील ३० लाख लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'कडे पाठ

३१ डिसेंबरची डेडलाईन; प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ कायमचा बंद मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

भारताने अल्प किंवा दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहावे: तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान

मुंबई : दहशतवाद रोखण्यासाठी आणि शेजारी राष्ट्रांबरोबर असलेल्या प्रादेशिक वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने उच्च

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार मुंबई : “मुख्यमंत्रीपदी