माजी खेळाडू, पंचांच्या निवृत्ती वेतनात वाढ

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या सर्व माजी क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर करताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, ‘आपल्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. खेळाडू हे क्रिकेट बोर्डासाठी एखाद्या जीवनरेखेप्रमाणे असतात. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांची काळजी घेणे ही बोर्डाची जबाबदारी आहे. पंच हे ‘अनसंग’ हिरोसारखे असतात. त्यांच्या योगदानाची बीसीसीआयला जाणीव आहे’.

ज्या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंना आतापर्यंत ३० हजार रुपये मिळत होते, त्यांना आता ५२ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. याशिवाय २००३ पूर्वी निवृत्त झालेल्या आणि २२ हजार ५०० रुपये निवृत्ती वेतन मिळणाऱ्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना आता ४५ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमधून मिळणारी कमाई भविष्यात खेळाडूंच्या सुविधा आणि गरजांवरही वापरली जाऊ शकते, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे.

दरम्यान, आयपीएल माध्यम हक्कांच्या लिलावाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत बीसीसीआयने सुमारे ४६ हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईचा वापर म्हणून बीसीसीआयने आपल्या माजी महिला व पुरुष क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या मासिक निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. ज्या माजी कसोटीपटूंना ३७ हजार ५०० रुपये मिळत होते, त्यांना आता ६० हजार रुपये मिळणार आहेत. तर, ज्यांना ५० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळत होते त्यांना आता ७० हजार रुपये दिले जाणार आहेत.

Tags: bcciipl

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago