राज्यात २९५६ नवीन कोरोना बाधित तर चौघांचा मृत्यू, १८२६७ ॲक्टिव्ह

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २९५६ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर चार कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या एकूण १८२६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज २१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७७,४९,२७६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९० टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१३,८३,११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१५,४१८ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी २ रुग्ण ठाण्यात आढळले 


राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी २ रुग्ण ठाणे शहरात आढळून आले आहेत. या पैकी एक रुग्ण २५ वर्षांची महिला तर दुसरा रुग्ण ३२ वर्षांचा पुरुष आहे. हे रुग्ण २८ आणि ३० मे २२ रोजी कोविड बाधित आढळले आणि हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण झालेले आहे.


बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जनुकीय क्रमनिर्धारणात सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण बीए. २ या विषाणू उपप्रकाराचे आढळत असून त्या खालोखाल बी ए.२.३८ चे रुग्ण आढळत आहेत.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल