राज्यात २९५६ नवीन कोरोना बाधित तर चौघांचा मृत्यू, १८२६७ ॲक्टिव्ह

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २९५६ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर चार कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या एकूण १८२६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज २१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७७,४९,२७६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९० टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्का एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१३,८३,११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१५,४१८ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी २ रुग्ण ठाण्यात आढळले 


राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी २ रुग्ण ठाणे शहरात आढळून आले आहेत. या पैकी एक रुग्ण २५ वर्षांची महिला तर दुसरा रुग्ण ३२ वर्षांचा पुरुष आहे. हे रुग्ण २८ आणि ३० मे २२ रोजी कोविड बाधित आढळले आणि हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण झालेले आहे.


बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जनुकीय क्रमनिर्धारणात सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण बीए. २ या विषाणू उपप्रकाराचे आढळत असून त्या खालोखाल बी ए.२.३८ चे रुग्ण आढळत आहेत.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून