ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर सायबर हल्ला

  97

ठाणे (प्रतिनिधी) : जगभरातील मुस्लिमांची माफी मागावी अशी मागणी करत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी ठाणे पोलिसांच्या वेबसाईट वर हल्ला करुन खळबळ माजवली. ठाणे पोलिसांच्या वेबसाईट वर हल्ला झाला असल्याची बातमी मंगळवारी समोर येताच ठाणे पोलीस दलात एकच धावपळ उडाली. हा सायबर हल्ला सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला असल्याची पुर्व प्रार्थमिक माहिती प्राप्त झाली आहे.


सायबर विभागासह गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची दहा पथके या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सज्ज करण्यात आली असून त्यांनी तपास सूरू केला आहे. दरम्यान वेबसाईट पुर्ववत करण्यासाठीं पोलिस युद्ध पातळीवरील प्रयत्न करत आहेत. वेबसाईट वर ठाणे पोलिसांची माहिती त्याच प्रमाणे अधिकाऱ्यांचे फोन नंबर असून ते गायब झाले आहेत. वेबसाईट वर फक्त सांकेतिक भाषा दिसत आहे. सदरचा प्रकार लक्षात येताच ठाणे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब ची मदत घेतली आहे.


मागिल काही दिवसांपासून प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून भाजपाने नुपूर शर्मा यांना निलंबित केले असले, तरी त्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक महत्त्वाच्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर हॅकर्सकडून हल्ले केले जात आहेत. त्यात आता ठाणे पोलिसांच्या वेबसाईटचा देखील समावेश झाला आहे. आज ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक करून हॅकर्सनी त्यावर धमकी देणारा संदेश पोस्ट केला आहे.


या प्रकाराची ठाणे पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात आली असली, तरी देशातल्या अनेक महत्त्वाच्या वेबसाईट्स या हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या हॅकर्सचा शोध सुरू केलेला आहे. ‘वन बॅट सायबर टीम- इंडोनेशियन डिफेसर’ असा या हॅकर टीमचे नाव असल्याचे संदेशातून दिसत आहे.


इस्लाम आणि पैंगबर यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या जात आहेत त्या बद्दल सरकारने जगभरातील मुस्लिमांची माफी मागावी अशी हल्लेखोरांची मागणी आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या