राहुल गांधी यांची ईडीकडून कसून चौकशी

नवी दिल्ली (हिं.स.) : नॅशनल हेरॉल्ड खरेदी व्यवहारातील मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कसून चौकशी केली. राहुल यांची ३ तास चौकशी केल्यानंतर दुपारी अडच वाजता त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली.


राहुल गांधी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. यावेळी तब्बल ३ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी त्यांनी रुग्णालयात जाऊन सोनियां गांधींची भेट घेतली. त्यानंतर काही वेळाने ते दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले. दरम्यान सकाळी राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना घेतले. राहुल यांच्या चौकशीच्या विरोधात सोमवारी देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. दिल्लीमध्ये प्रियंका गांधी यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नेत्यांची भेटही घेतली.


राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले तेव्हा पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोबत होत्या. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतच राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले होते. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिसऱ्या बॅरिकेडजवळ रोखलं. यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी पुढे गेले असता नेते तिथेच बसून राहिले. काही वेळाने पोलिसांनी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि बसमधून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. प्रियंका गांधी या नेत्यांची भेट घेण्यासाठी तुघलक रोड पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.


नेमके प्रकरण काय आहे....?


स्वातंत्र्यपूर्व काळात जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी असोसिएट जर्नल्स नावाची कंपनीची स्थापना करून हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत तीन वर्तमानपत्रे सुरू केली होती. त्यापैकी नॅशनल हेरॉल्ड हे इंग्रजी दैनिक होते. स्वातंत्र्योत्तर काळात हे वृत्तपत्र बंद पडले. त्यानंतर २०१२ मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या 'यंग इंडिया' या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरू करण्यात आले नव्हते. हे हक्क घेताना १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा प्रत्येकी ३८ टक्के हिस्सा आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. पटियाला हाऊस न्यायालयाने राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. यंग इंडियाने फक्त ५० लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर करण्यात आला होता.


सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप आहे की, गांधी कुटुंब हेराल्डच्या मालमत्तांचा बेकायदेशीरपणे वापर करत आहे. ज्यात दिल्लीतील हेराल्ड हाऊस आणि इतर मालमत्ता आहेत. या आरोपांबाबत ते २०१२ मध्ये न्यायालयात गेले होते. प्रदीर्घ सुनावणीनंतर २६ जून २०१४ रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले. तेव्हापासून या आदेशाची अंमलबजावणी प्रलंबित आहे. तसेच सोनिया आणि राहुल याप्रकरणी जामीनावर आहेत.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील