विधान परिषद निवडणूक : १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

मुंबई (हिं.स.) : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ११ उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली असून भाजपाचे पाच, तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार एकमेकांशी भिडणार आहेत.


उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपा पुरस्कृत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजीराव गर्जे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी एकूण ११ उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


कोणत्या पक्षाचे उमेदवार रिंगणात


भाजपा - १) प्रवीण दरेकर, २) राम शिंदे, ३) श्रीकांत भारतीय, ४) उमा खापरे आणि ५) प्रसाद लाड


शिवसेना - १) सचिन अहिर, २) आमशा पाडवी


राष्ट्रवादी - १) रामराजे निंबाळकर, २) एकनाथ खडसे


काँग्रेस - १) भाई जगताप, २) चंद्रकांत हंडोरे


सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव - फडणवीस


सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष आहे. त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती, पण काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने निवडणूक होत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी आमची पाचवी जागा निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सहावी जागा लढणे शक्य नसल्याने सदाभाऊंचा अर्ज मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यसभेप्रमाणे चमत्कार होणार याची चर्चा सुरू - चंद्रकांत पाटील


भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे की, काही सत्ताधारी आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेप्रमाणे चमत्कार होणार याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभा ये तो झांकी है २० तारीख अभी बाकी है| विधान परिषद निवडणुकीतही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल.


देशमुख-मलिकांना मतदानाची परवानगी मिळणार का?


दरम्यान राज्यसभा निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचं असताना राष्ट्रवादीचे तुरुंगात असलेले आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयाकडूनही नाकारण्यात आली होती. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तरी यांना परवानगी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत

BMC Budget 2026 : मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - महापौर रितू तावडे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वित्तीय वर्ष २०२६-२०२७ करिता सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज हे

उंदीर फळे खातात म्हणून फळविक्रेत्याने फळांना चक्क 'रॅट किलर' औषध लावलं; दोघांना अटक

मुंबई: मुंबई शहरात जर तुम्ही रस्त्यावर फळ घेत असाल तर सावधान! कारण मालाड परिसरात फळ विक्रेताचा एक अतिशय धक्कादायक

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४