अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांतला अटक

मुंबई (हिं.स.) : बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला बंगळुरू पोलिसांनी अंमली पदार्थ सेवन प्रकरणी ताब्यात घेतले आहे. सिद्धांतसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहा जणांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्या सर्वांनी ड्रग्सचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती बंगळुरू पोलिसांनी माध्यमांना दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील उलसूर पोलिसांनी रविवारी रात्री १२ वाजता एका हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात ५० हून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही हायप्रोफाईल पार्टी सुरू होती. तेथून सिद्धांतसह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


सिध्दांत कपूरने 'शूटआउट अॅट वडाला', 'चेहरे', अग्ली या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय 'भूल भुलैया', 'चुप चुप के', 'ढोल', 'भागम भाग' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शनही केले आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या भौकाल या सीरिजमध्ये चिंटू देढा नावाची भूमिका त्याने साकारली होती.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक