महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

सेनेच्या भूमिकेने महाविकास आघाडीत ‘बिघाडी’

  102

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर आता शिवसेनेने येत्या २० तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत असहकाराची भूमिका घेतल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.


राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला तर संजय राऊत थोडक्यात बचावले. महाविकास आघाडीला धूळ चारत भारतीय जनता पार्टीने आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणले. महाविकास आघाडीसोबतच अपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या आमदारांना गृहीत धरून महाविकास आघाडीने या निवडणुकीतील रणनीती तयार केली होती. यामध्ये ४१ मतांचा कोटा ठरल्याने तीनही उमेदवारांना प्रत्येकी ४२ मते देऊन चौथ्या उमेदवारालाही पहिल्या पसंतीच्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा होता. शिवसेनेच्या कोट्यातील सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद केले.


नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानच करू शकले नाहीत आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने ऐनवेळी आपला कोटा वाढवून घेतल्याने सर्व गणित बिघडले आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. या निवडणुकीत काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना ४४ तर प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते पडली. ज्या अपक्ष वा लहान पक्षाच्या काही आमदारांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकली असा शिवसेनेच्या नेत्यांना संशय आहे ते काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या सहकारी पक्षांशी असहकार्य करण्याचे ठरविले असल्याचे बोलले जाते. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांची जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे कळते.


विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होणार आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपाचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. त्यातच काँग्रेसने मित्रपक्षांच्या मदतीच्या भरवशावर आणखी एक उमेदवार दिला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते मात्र चिंतेत पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट

मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी

Uddhav Thackeray and Raj Thackeray alliance : ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेच मोठं भाष्य; म्हणाला, "दोन्ही भाऊ एकत्र आले तर..."

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यामध्ये

गोरेगाव गोकुळधाममधील इमारतीत उघड्या जागेवर बकऱ्यांची कुर्बानी

स्थानिक रहिवाशांनी घेतली हरकत मुंबई (खास प्रतिनिधी): बकरी ईद निमित्त बकऱ्यांची कुर्बानी इमारती तथा गृहनिर्माण

'महामार्गांवर स्वच्छ शौचालये सर्वांची जबाबदारी'

मुंबई : राज्यातील सर्व महामार्गावरील धाबे, हॉटेल, मॉल या ठिकाणांसह सर्व सार्वजनिक शौचालये स्वच्छ आणि सुस्थितीत

‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास

एमएमआरडीने हरित वाटचालीत गाठला महत्त्वाचा टप्पा

जागतिक पर्यावरण दिनी दोन मेट्रो मार्गिकांना मिळाले कार्बन-न्यूट्रल प्रमाणपत्र मुंबई  : जगभरात जागतिक पर्यावरण