भाजपाच्या महाडिकांचा 'जय', शिवसेनेच्या पवारांचा 'पराजय'

  105

मुंबई (हिं.स.) : राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाची सरशी झाली असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या निकालात भाजपाचे पीयुष गोयल ४८, अनिल बोंडे ४८, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी ४४, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल ४३ आणि शिवसेनेच्या संजय राऊत ४२ मतांनी विजयी झाले. दरम्यान सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या संजय पवार यांच्यात खरी चुरस होती. मात्र यात अपक्षांच्या मतांवर भाजपाचे धनंजय महाडिक ४१.५ मते मिळून ते विजयी झाले. तर संजय पवार यांना ३३ मते मिळून ते पराभूत झाले. पवार पराभूत झाल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपाने दोन ऐवजी तीन उमेदवार दिल्याने एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने मतदान करण्याची परवानगी नाकारली. तर शिवसेनेचे अंधेरीतील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे तीन आमदार कमी होते.


नियमानुसार शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल येणे अपेक्षित होते. मात्र महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपाने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे आयोगाने मतमोजणीला स्थगिती दिली. त्यानंतर आयोगाच्या स्तरावर बैठकांवर बैठका झाल्या. दरम्यान कॉंग्रेस आणि भाजपाकडूनही आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे तब्बल ९ तासानंतर मतमोजणी सुरू झाली.


मतमोजणीत भाजपाच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा अधिकची मते मिळाल्याने भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. तर शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. पहिल्या फेरीत पवार यांना ३३, महाडिक यांना २७ मते मिळाली होती. मात्र दुसऱ्या पसंतीच्या फेरीत महाडिक यांना ४१.५ मते मिळून त्यांची सरशी झाली. यावरून भाजपाचे १०६ आमदार आहेत. त्या व्यतिरिक्त अधिकची १७ मते आपल्या पारड्यात टाकण्यात भाजपाला यश आल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.


या निवडणुकीत महाविकास आघाडीवर नाराज असलेले काही छोटे पक्ष आणि अपक्षांनी आपली मते भाजपा उमेदवाराच्या पारड्यात टाकली असल्याची चर्चा आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड