भाजपाच्या महाडिकांचा 'जय', शिवसेनेच्या पवारांचा 'पराजय'

मुंबई (हिं.स.) : राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाची सरशी झाली असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या निकालात भाजपाचे पीयुष गोयल ४८, अनिल बोंडे ४८, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी ४४, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल ४३ आणि शिवसेनेच्या संजय राऊत ४२ मतांनी विजयी झाले. दरम्यान सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या संजय पवार यांच्यात खरी चुरस होती. मात्र यात अपक्षांच्या मतांवर भाजपाचे धनंजय महाडिक ४१.५ मते मिळून ते विजयी झाले. तर संजय पवार यांना ३३ मते मिळून ते पराभूत झाले. पवार पराभूत झाल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपाने दोन ऐवजी तीन उमेदवार दिल्याने एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने मतदान करण्याची परवानगी नाकारली. तर शिवसेनेचे अंधेरीतील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे तीन आमदार कमी होते.


नियमानुसार शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल येणे अपेक्षित होते. मात्र महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपाने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे आयोगाने मतमोजणीला स्थगिती दिली. त्यानंतर आयोगाच्या स्तरावर बैठकांवर बैठका झाल्या. दरम्यान कॉंग्रेस आणि भाजपाकडूनही आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे तब्बल ९ तासानंतर मतमोजणी सुरू झाली.


मतमोजणीत भाजपाच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा अधिकची मते मिळाल्याने भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. तर शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. पहिल्या फेरीत पवार यांना ३३, महाडिक यांना २७ मते मिळाली होती. मात्र दुसऱ्या पसंतीच्या फेरीत महाडिक यांना ४१.५ मते मिळून त्यांची सरशी झाली. यावरून भाजपाचे १०६ आमदार आहेत. त्या व्यतिरिक्त अधिकची १७ मते आपल्या पारड्यात टाकण्यात भाजपाला यश आल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.


या निवडणुकीत महाविकास आघाडीवर नाराज असलेले काही छोटे पक्ष आणि अपक्षांनी आपली मते भाजपा उमेदवाराच्या पारड्यात टाकली असल्याची चर्चा आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी