भाजपच्या विजयानंतर फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

  33

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आज मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी म्हटले की, आपला विजय हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे. त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा निवडून आली. आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहेत काही पिसाळले असल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केला. निवडणुकीत जे विजयी होतात त्यांनी आनंद साजरा करायचा असतो, त्यांनी उन्माद करायचा नसतो असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.


या पराभवानंतर आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने अंतर्मुख व्हायला हवे असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. राज्यातील विकास थांबला आहे. आमच्या काळातले सर्व प्रकल्प थांबवून राज्याचे अतोनात नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांना मोठा फायदा होत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. किमान दोन कामे राज्य सरकारने दाखवावी असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.


फडणवीस यांनी आगामी विधान परिषदेसाठी भाजप सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसद्‌बुद्धि जागृत असेल असा दावा त्यांनी केला.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र