बुमराहला आयसीसीकडून मिळाले ‘खास’ गिफ्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नुकताच क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आयपीएलनंतर, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचा भाग नाही.


दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये बुमराहने हातात लाल टोपी घेतली आहे. ही कॅप दशकातील आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय संघाची आहे. आयसीसीने २०२० मध्ये सर्व फॉरमॅटमधील टीम ऑफ द डिकेडची घोषणा केली होती. टी-२० मध्ये भारताचे चार खेळाडू निवडण्यात आले होते.


यात जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश होता. या संघाचा कर्णधार म्हणून धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. जवळपास १८ महिन्यांनी आयसीसीने बुमराहला या संघाची कॅप पाठवून दिली आहे. या कॅपचा फोटो शेअर करत बुमराहने ‘या सन्मानासाठी धन्यवाद आयसीसी’ असे कॅप्शनही दिले.


जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारतासाठी टी-२० पदार्पण केले होते, त्याचा या फॉरमॅटमध्ये एक आश्चर्यकारक रेकॉर्ड आहे. त्याने आतापर्यंत ५७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ ६.५१ च्या सरासरीने धावा देऊन ६७ बळी घेतले आहेत. बुमराहने शेवटचा टी-२० सामना फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात