बुमराहला आयसीसीकडून मिळाले ‘खास’ गिफ्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नुकताच क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आयपीएलनंतर, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचा भाग नाही.


दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये बुमराहने हातात लाल टोपी घेतली आहे. ही कॅप दशकातील आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय संघाची आहे. आयसीसीने २०२० मध्ये सर्व फॉरमॅटमधील टीम ऑफ द डिकेडची घोषणा केली होती. टी-२० मध्ये भारताचे चार खेळाडू निवडण्यात आले होते.


यात जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश होता. या संघाचा कर्णधार म्हणून धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. जवळपास १८ महिन्यांनी आयसीसीने बुमराहला या संघाची कॅप पाठवून दिली आहे. या कॅपचा फोटो शेअर करत बुमराहने ‘या सन्मानासाठी धन्यवाद आयसीसी’ असे कॅप्शनही दिले.


जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारतासाठी टी-२० पदार्पण केले होते, त्याचा या फॉरमॅटमध्ये एक आश्चर्यकारक रेकॉर्ड आहे. त्याने आतापर्यंत ५७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ ६.५१ च्या सरासरीने धावा देऊन ६७ बळी घेतले आहेत. बुमराहने शेवटचा टी-२० सामना फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत