बुमराहला आयसीसीकडून मिळाले ‘खास’ गिफ्ट

  46

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नुकताच क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आयपीएलनंतर, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचा भाग नाही.


दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये बुमराहने हातात लाल टोपी घेतली आहे. ही कॅप दशकातील आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय संघाची आहे. आयसीसीने २०२० मध्ये सर्व फॉरमॅटमधील टीम ऑफ द डिकेडची घोषणा केली होती. टी-२० मध्ये भारताचे चार खेळाडू निवडण्यात आले होते.


यात जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश होता. या संघाचा कर्णधार म्हणून धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. जवळपास १८ महिन्यांनी आयसीसीने बुमराहला या संघाची कॅप पाठवून दिली आहे. या कॅपचा फोटो शेअर करत बुमराहने ‘या सन्मानासाठी धन्यवाद आयसीसी’ असे कॅप्शनही दिले.


जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारतासाठी टी-२० पदार्पण केले होते, त्याचा या फॉरमॅटमध्ये एक आश्चर्यकारक रेकॉर्ड आहे. त्याने आतापर्यंत ५७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ ६.५१ च्या सरासरीने धावा देऊन ६७ बळी घेतले आहेत. बुमराहने शेवटचा टी-२० सामना फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल