नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नुकताच क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आयपीएलनंतर, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचा भाग नाही.
दरम्यान, त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये बुमराहने हातात लाल टोपी घेतली आहे. ही कॅप दशकातील आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय संघाची आहे. आयसीसीने २०२० मध्ये सर्व फॉरमॅटमधील टीम ऑफ द डिकेडची घोषणा केली होती. टी-२० मध्ये भारताचे चार खेळाडू निवडण्यात आले होते.
यात जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश होता. या संघाचा कर्णधार म्हणून धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. जवळपास १८ महिन्यांनी आयसीसीने बुमराहला या संघाची कॅप पाठवून दिली आहे. या कॅपचा फोटो शेअर करत बुमराहने ‘या सन्मानासाठी धन्यवाद आयसीसी’ असे कॅप्शनही दिले.
जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारतासाठी टी-२० पदार्पण केले होते, त्याचा या फॉरमॅटमध्ये एक आश्चर्यकारक रेकॉर्ड आहे. त्याने आतापर्यंत ५७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने केवळ ६.५१ च्या सरासरीने धावा देऊन ६७ बळी घेतले आहेत. बुमराहने शेवटचा टी-२० सामना फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…