राज्यसभेचे ४१ खासदार बिनविरोध विजयी

Share

नवी दिल्ली (हिं.स.) : देशातील १५ राज्यांमधल्या राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यापैकी ११ राज्यांमधील ४१ जागांवरील निवडणूक बिनविरोध झालीय. बिनविरोध विजयी होणाऱ्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, पी. चिदंबरम आणि राजीव शुक्ला यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि हरियाणा या ४ राज्यातील १६ जागांसाठी मतदान घेण्यात आले.

उत्तर प्रदेशातून ११ खासदार विजयी झाले असून यापैकी ८ जण भाजपचे आहेत. भाजपच्या उमेदवारांमध्ये लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ.राधामोहनदास अग्रवाल, महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा दर्शना सिंह, संगीता यादव, बाबुराम निषाद, राज्यसभा सदस्य सुरेंद्र कुमार नागर, डॉ.के. लक्ष्मण आणि माजी खासदार मिथिलेश कुमार यांचा समावेश आहे. तर समाजवादी पार्टी आघाडीकडून, जावेद अली, आरएलडीचे जयंत चौधरी आणि सपाला पाठिंबा असलेले कपिल सिब्बल यांचा समावेश आहे. बिहारमधून ५ जागांवर मतदान न करता खासदार निवडून आले आहेत. यामध्ये भाजपाला दोन, आरजेडीला दोन आणि जेडीयूला एक जागा देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील ४ जागांवर निवडून आलेले सर्व खासदार वायएसआर काँग्रेसचे आहेत.

तामिळनाडूतून ६ खासदार मतदानाशिवाय निवडून आले आहेत. तेलंगणात २ जागांवर टीआरएसचे बी. पार्थसारधी रेड्डी आणि डी. दामोदर राव. छत्तीसगडमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि रंजीत रंजन बिनविरोध निवडून आले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला दोन्ही जागा मिळाल्या. येथून बलबीर सिंह सीचेवाल आणि विक्रमजीत सिंह साहनी राज्यसभेत पोहोचले. झारखंडमध्ये महुआ माझी एक जागा आणि एक जागा भाजपच्या आदित्य साहू यांच्या बाजूने गेली. उत्तराखंडमधील भाजपाच्या उमेदवार डॉ. कल्पना सैनी राज्यसभेत पोहोचल्या आहेत. मध्य प्रदेशात भाजपला २ तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मिकी भाजपाकडून तर विवेक तनखा काँग्रेसकडून निवडून आले. तर, ओडिशातील तीनही जागा बीजेडीच्या बाजूने गेल्या आहेत.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

7 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

8 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

8 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

9 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

10 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

10 hours ago