कुंटूंब रंगलेय बारावीच्या यशात

  98

सुनील बोडके


वाळुंज (त्र्यंबकेश्वर) : मागील दोन वर्षापासून कोरोनाने शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण भागात अनेक अडचणीमुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असताना त्याच ग्रामीण भागातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे येथील एकाच घरातील देहाडे कुटुंबायांनी मात्र इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.


म्हणतात ना माणूस आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत विद्यार्थी असतो, त्याचप्रमाणे देहाडे कुटूंबातील कुटुंब प्रमुख लक्ष्मण मुरलीधर देहाडे (वय वर्ष ४५) यांनी आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करत इयत्ता १२ वीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला व ६४ टक्के गुण मिळवत तालुक्यात आदर्श घालून दिला आहे, त्याचबरोबर मोठी सून वृत्तिका ६४ टक्के व लहान मुलगा समीर ५५ टक्के गुण मिळवले आहे.


देहाडे कुटुंबियांच्या या यशाने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व शिक्षणा विषयी त्यांची गोडी या बदल अभिनंदन केले, यात तिघांनी मिळून एकत्र अभ्यास, चर्चा करून परीक्षा दिली आणि मोठे यश संपादन केले, यावेळी त्यांना मोलाची साथ दिली ती घरातील अन्य सदस्य मुलगा तुषार लक्ष्मण देहाडे, तसेच पत्नी विमल लक्ष्मण देहाडे यांनी या यशात सर्वांचा मोलाचा वाटा असल्याची लक्ष्मण देहाडे सांगतात.


परिस्थिती मुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली कुटुंबियाणी मोलाची साथ देत यशाचा मार्ग सुकर केला, समाजाला शिक्षणा शिवाय पर्याय नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात ते उगाच नाही, अजूनही पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे. - लक्ष्मण देहाडे

Comments
Add Comment

Mumbai Nanded Vande Bharat : मुंबई-जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार, जाणून घ्या वेळापत्रक, थांबे अन् तिकीटदर

मुंबई : मुंबई आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात