'शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना आमदार नक्की मतदान करतील'

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या माजी आमदार सदाभाऊंना विद्यमान आमदार मतदान करतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सदाभाऊ खोत हे अपक्ष उमेदवार असून त्यांना भाजपने समर्थन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.


विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सदाभाऊ खोत यांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपचा पाठिंबा आहे. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी भाजप त्यांचे समर्थन करणार आहे. त्यामुळे अधिकृत पाच उमेदवार आणि अपक्ष एक असे सहा उमेदवार भाजपचे निवडून येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान, सहाव्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवून भाजपने लढत कडवी केली आहे. आज सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी यासंबंधी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती.

Comments
Add Comment

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी