मुंबई : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या माजी आमदार सदाभाऊंना विद्यमान आमदार मतदान करतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सदाभाऊ खोत हे अपक्ष उमेदवार असून त्यांना भाजपने समर्थन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सदाभाऊ खोत यांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपचा पाठिंबा आहे. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी भाजप त्यांचे समर्थन करणार आहे. त्यामुळे अधिकृत पाच उमेदवार आणि अपक्ष एक असे सहा उमेदवार भाजपचे निवडून येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सहाव्या जागेसाठी उमेदवार मैदानात उतरवून भाजपने लढत कडवी केली आहे. आज सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी यासंबंधी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…