सदाभाऊ खोतांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : भाजपने राज्यसभा निवडणुकीत उमेदवार दिला आहे. तर आज विधान परिषद निवडणुकीसाठी शेतकरी नेते सदाभाऊ खोतांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून खोतांना भाजपने पाठींबा दिला आहे. यामुळे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांना आता चांगलीच रंगत आली आहे.


भाजपने राज्यसभा निवडणुकांत उमेदवार दिल्याने शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. तर, विधान परिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत निवडणुकीत राजकीय चुरस निर्माण केली आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपचे समर्थन असणार आहे.


भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने या निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना संधी दिलेली नाही. मात्र, आता सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवले आहे.


उमा खापरे यांच्यासोबत त्यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला.

Comments
Add Comment

Latur: वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दीड तासात दिला बारावीचा पेपर; शिवानीची जिद्द मनाला चटका लावून गेली

लातूर: लातूरमधील एका १७ वर्षीय मुलीच्या जिद्दीला सलाम करणारी घटना समोर आली आहे. या मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली

Maharashtra Agri AI : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले महाराष्ट्र ‘अॅग्री एआय पॉलिसी’चे कौतुक

मुंबई : महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र ‘अ‍ॅग्री एआय पॉलिसी’ स्वागतार्ह असून इतर राज्यांनीही त्याचे

Pune Airport: हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवा रद्द

पुणे: थायलंडच्या सहलीचं नियोजन करणाऱ्या पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. प्रसिद्ध विमान कंपनी 'इंडिगो'ने

Buldhana News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; गावात संचारबंदी लागू

बुलढाणा : बुलढाणा मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. याच

Maharashtra Unseasonal Rain: महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

मुंबई: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, गोंदिया

Police: सरकारचा मोठा निर्णय; ५१ हजार पोलिसांना लागू होणार नवा नियम

मुंबई: पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस