सुबोधकुमार जयस्वालांना न्यायालयाची नोटीस

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने जयस्वाल यांना गुरुवारी नोटीस बजावली आहे. राज्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी जयस्वाल यांच्याविरोधात उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे.


सुबोध जयस्वाल यांना भ्रष्टाचारविरोधी प्रकरणाचा तपास करण्याचा अनुभव नसल्याचा दावा करत त्यांची विश्वासार्हता संशयास्पद असल्याचेही त्रिवेदी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. मुद्रांक घोटाळ्याप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास समितीचे नेतृत्व जयस्वाल करत होते. त्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचाही समावेश होता. मात्र या समितीवर अनेक आरोप करण्यात आले. त्यानंतर घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला.


जयस्वाल आपल्या पदाचा गैरवापर करत होते. आपण त्यांच्याविरोधात आवाज उठविल्याबद्दल आपली गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याचा आरोप राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय प्रधिकरणाने बदली रद्द केली असल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी याचिकेतून केला आहे.


दुसरीकडे २०१९ ते २०२० या काळात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख गृहमंत्री तर जयस्वाल महाराष्ट्र पोलीस महासंचालक असताना करण्यात आलेल्या बदल्या आणि पदांच्या शिफारशी जयस्वाल यांनी मंजूर केल्या होत्या. आता तेच जयस्वाल सीबीआय संचालक असताना सीबीआय त्या गैरव्यवहारांची चौकशी कशी करू शकते, असा सवालही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.


अशा अधिकाऱ्याची सीबीआयसारख्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती करणे राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी संबंधित असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पूर्वग्रहच निर्माण करेल. तपास यंत्रणेवर सामान्य जनतेने सोपवलेल्या विश्वासाला तडा जाईल असेही याचिकेत ले म्हटले आहे.

Comments
Add Comment

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये