सेनेच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला मिळणार फायदा

  85

अतुल जाधव


ठाणे : आरक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर शहरात महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुका लांबल्यानंतर ठाणे शहरात सुरू असलेल्या आयाराम गयाराम नाट्याला खीळ बसली होती; परंतु आता पुन्हा या नाट्याला सुरुवात होणार असे चित्र आहे. ठाण्यात पुन्हा भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.


राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना फुटल्यामुळे ठाण्यात भाजप एकाकी पडली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरात आपली ताकद वाढवण्यासाठी पत्ते टाकण्यास सुरुवात केली असून शिवसेना पक्षात असलेल्या नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत असून शिवसेना पक्षातील नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना भाजपकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.


शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपखाडी भागातील सेनेच्या नाराज शिलेदारांना हेरून त्यांना पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून गळ घातली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.


याशिवाय प्रभागात प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपकडून संपर्क साधला जात असल्याचेही वृत्त आहे. यानिमित्ताने ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी शहरात मिशन कमळ राबविण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली असून त्यासाठी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नाराज शिलेदारांवर भाजपचा डोळा असल्याचे सूत्रांकडून समजते.


कुरघोडीचे राजकारण सुरू...


ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षण प्रक्रिया नुकतीच उरकण्यात आली असून पावसाळ्यानंतर पालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार कामाला लागल्याचे चित्र आहे. असेच काहीसे चित्र काही महिन्यांपूर्वी शहरात होते.


इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक प्रभागात नाराजीच्या नाट्याचा खेळ रंगणार आहे. त्रीसदस्य प्रभाग रचना असल्याने विद्यमान नगरसेवकांना संधी द्यायची की मतदारांसमोर नवीन चेहरा द्यायचा?
हा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे.


महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागांची रचना मोठ्यप्रमाणावर बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह माजी तसेच इच्छुक उमेदवारांसमोर उमेदवारी मिळण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या