सेनेच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला मिळणार फायदा

अतुल जाधव


ठाणे : आरक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर शहरात महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुका लांबल्यानंतर ठाणे शहरात सुरू असलेल्या आयाराम गयाराम नाट्याला खीळ बसली होती; परंतु आता पुन्हा या नाट्याला सुरुवात होणार असे चित्र आहे. ठाण्यात पुन्हा भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.


राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना फुटल्यामुळे ठाण्यात भाजप एकाकी पडली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरात आपली ताकद वाढवण्यासाठी पत्ते टाकण्यास सुरुवात केली असून शिवसेना पक्षात असलेल्या नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत असून शिवसेना पक्षातील नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना भाजपकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.


शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपखाडी भागातील सेनेच्या नाराज शिलेदारांना हेरून त्यांना पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून गळ घातली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.


याशिवाय प्रभागात प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपकडून संपर्क साधला जात असल्याचेही वृत्त आहे. यानिमित्ताने ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी शहरात मिशन कमळ राबविण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली असून त्यासाठी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नाराज शिलेदारांवर भाजपचा डोळा असल्याचे सूत्रांकडून समजते.


कुरघोडीचे राजकारण सुरू...


ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षण प्रक्रिया नुकतीच उरकण्यात आली असून पावसाळ्यानंतर पालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार कामाला लागल्याचे चित्र आहे. असेच काहीसे चित्र काही महिन्यांपूर्वी शहरात होते.


इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक प्रभागात नाराजीच्या नाट्याचा खेळ रंगणार आहे. त्रीसदस्य प्रभाग रचना असल्याने विद्यमान नगरसेवकांना संधी द्यायची की मतदारांसमोर नवीन चेहरा द्यायचा?
हा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे.


महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागांची रचना मोठ्यप्रमाणावर बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह माजी तसेच इच्छुक उमेदवारांसमोर उमेदवारी मिळण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Comments
Add Comment

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या