गेल्या ३ दिवसांत नागपुरात उष्माघाताचे ४ बळी?

नागपूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे नागपुरातील पाराही चढाच आहे. याच उष्णतेच्या लाटेने नागपुरात ३ दिवसांत तब्बल ४ बळी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या ४ व्यक्तींना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण नागपुरात भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडूनही वारंवार काळजी घेण्याचे आवाहन नागपूरकरांना केले जात आहे. दरम्यान, सध्या नागपुरातील तापमानाचा पारा ४५ अंशांवर आहे.


६, ७ आणि ८ जून रोजी नागपूर शहरातील विविध भागात चार अनोळखी व्यक्ती रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना त्यावेळी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सध्या नागपुरात गेले अनेक दिवस तापमान सलग ४५ अंशांच्या वर आहे. त्यामुळे रस्त्यावर जीवन जगणाऱ्या या चौघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे का? असा संशय निर्माण झाला आहे.


६ जून रोजी नागपुरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत अशोक चौक येथे ५० वर्षीय पुरुष बेशुद्ध पडले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत जाहीर केले होते. तर, ७ जून रोजी सदर पोलीस स्टेशन अंतर्गत गड्डीगोदाम चौक येथे ५० वर्षीय पुरुष बेशुद्ध पडले होते, रूग्णालयात डॉक्टरांनी त्यांनाही तपासून मृत जाहीर केले होते. त्यानंतर ८ जून रोजी सदर पोलीस स्टेशन अंतर्गत छावणी बस स्टँड ४५ वर्षीय महिला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिलाही बेशुद्ध घोषित केलं होतं. तर, ८ जून रोजी अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत टिबी वॉर्ड परिसरात ३७ वर्षीय पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळला डॉक्टरांनी त्याला मृत जाहीर केले.


गेल्या १० दिवसांत नागपुरात कमालीची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. नागपुरातील वाढलेल्या पाऱ्यामुळे अंगाची लाहीलाही झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या इतरही समस्यांचा सर्वसामान्यांना सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा