गेल्या ३ दिवसांत नागपुरात उष्माघाताचे ४ बळी?

नागपूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे नागपुरातील पाराही चढाच आहे. याच उष्णतेच्या लाटेने नागपुरात ३ दिवसांत तब्बल ४ बळी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या ४ व्यक्तींना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण नागपुरात भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडूनही वारंवार काळजी घेण्याचे आवाहन नागपूरकरांना केले जात आहे. दरम्यान, सध्या नागपुरातील तापमानाचा पारा ४५ अंशांवर आहे.


६, ७ आणि ८ जून रोजी नागपूर शहरातील विविध भागात चार अनोळखी व्यक्ती रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना त्यावेळी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सध्या नागपुरात गेले अनेक दिवस तापमान सलग ४५ अंशांच्या वर आहे. त्यामुळे रस्त्यावर जीवन जगणाऱ्या या चौघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे का? असा संशय निर्माण झाला आहे.


६ जून रोजी नागपुरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत अशोक चौक येथे ५० वर्षीय पुरुष बेशुद्ध पडले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत जाहीर केले होते. तर, ७ जून रोजी सदर पोलीस स्टेशन अंतर्गत गड्डीगोदाम चौक येथे ५० वर्षीय पुरुष बेशुद्ध पडले होते, रूग्णालयात डॉक्टरांनी त्यांनाही तपासून मृत जाहीर केले होते. त्यानंतर ८ जून रोजी सदर पोलीस स्टेशन अंतर्गत छावणी बस स्टँड ४५ वर्षीय महिला बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिलाही बेशुद्ध घोषित केलं होतं. तर, ८ जून रोजी अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत टिबी वॉर्ड परिसरात ३७ वर्षीय पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळला डॉक्टरांनी त्याला मृत जाहीर केले.


गेल्या १० दिवसांत नागपुरात कमालीची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. नागपुरातील वाढलेल्या पाऱ्यामुळे अंगाची लाहीलाही झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या इतरही समस्यांचा सर्वसामान्यांना सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने