Categories: पालघर

प्रकल्पाला विरोध करणारे श्रेय लाटण्यासाठी पुढे पुढे करत आहेत – मनीषा चौधरी

Share

बोईसर (वार्ताहर) : वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना विरोध करत होते पण आज हेच या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी पुढे करत असल्याचे चित्र आहे, असे विधान दहिसर विधानसभेच्या आमदार मनीषा चौधरी यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत केले.

अजित पवार यांनी वाढवण बंदराविषयी डहाणू येथे सूचक वक्तव्य केले होते. काल त्यांनी बुलेट ट्रेनविषयीसुद्धा सकारात्मक असल्याचे एका वृत्त संस्थेला सांगितले होते. त्यावर आमदार मनीषा चौधरी यांनी वरील विधान केले. पालघर येथील शासकीय विश्रामगृहात केंद्र सरकारच्या आठ वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालघर शहर भाजपाध्यक्ष तेजराज सिंह हजारी, पुंडलिक भानुशाली इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सातपाटी बंदराचा विकास व्हावा. तिथल्या मच्छिमारांना नवीन आधुनिक सुविधा प्राप्त व्हाव्यात. यासाठी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून सातपाटी येथे हार्बर बंदर उभारणीसाठी निधी आला होता. पण आजतागायत या बंदराचे काम हाती घेण्यात आले नाही. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे आलेले पैसे परत गेल्याचा आरोप चौधरी यांनी केला. राज्यात ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. या मार्गात ६५ खाड्या असून त्यातील गाळ काढण्यासाठी केंद्र व राज्य यांनी एकत्रित काम करायचे होते. पण राज्य सरकार या कामासाठी सकारात्मकता दाखवणे अपेक्षित असताना त्यांची भूमिका या कामाच्या विरोधातच आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

थर्मल पॉवरमुळे बागायतदारांच्या फळ पिकांवर फरक पडला आहे. प्रदूषणाचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. पालघर जिल्ह्यात वीज तयार होते. पाणीसुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तरीपण आपल्याकडील लोकांना अंधारात राहावे लागते. ग्रामीण भागामध्ये मैलोन्मैल पायी प्रवास करून महिलांना डोक्यावर हंडे भरून पाण्यासाठी पायपीट करावी लागल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये पाहत आहोत.

जयंत पाटील येथे आले असताना पूर्वेचे पाणी पश्चिमेला देऊ असे आश्वासन त्यांनी लोकांना दिले होते. मात्र आजतागायत काहीच झाले नाही. फुटलेल्या नारळाएवढे पाणीसुद्धा पश्चिमेला आले नाही, असा टोला चौधरी यांनी हाणला. पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या काळातले, हॉस्पिटलचे भूमिपूजनसुद्धा फडणवीस यांनी केले होते. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या काळात पालघर जिल्ह्यातील रस्त्यासाठी केंद्राकडून ३६०० कोटी देण्यात आले होते. पूल फ्लाय ओव्हरची कामे जी सुरू आहे ती केंद्राच्या पैशानेच सुरू आहेत, असेही चौधरी यांनी सांगितले.

मी दहिसर विधानसभेची आमदार जरी असले तरी मी पालघर जिल्ह्याची भूमिपुत्र आहे. इथल्या प्रश्नांविषयी मी रात्री उशिरापर्यंत विधानसभेत थांबते व इथल्या भागातील विविध समस्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करते, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्थानिक आमदारांना लगावला.

Recent Posts

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

17 minutes ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

8 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

9 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

9 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

10 hours ago