पंतप्रधान करणार आयकॉनिक सप्ताहाचे उद्घाटन

नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार ६ जून रोजी सकाळी १०:३० वाजता नवी दिल्ली येथे विज्ञान भवन येथे अर्थ मंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आठवडाभराच्या भव्य सोहोळ्याचं उद्घाटन करतील. ६ ते ११ जून, २०२२ हा आठवडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा (AKAM) निमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाग आहे.


पंतप्रधान यावेळी ‘जन समर्थ पोर्टल’ या सरकारी योजनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करतील. या एकाच डिजिटल संकेतस्थळावर सरकारच्या सर्व अनुदान-आधारित योजना उपलब्ध होतील. लाभार्थ्यांना अनुदान-पुरवठादारांशी थेट जोडणारे हे अशा प्रकारचे हे पहिलेच व्यासपीठ आहे.


विवध क्षेत्रांना मार्गदर्शना द्वारे सोप्या डिजिटल प्रक्रीयेच्या मदतीने योग्य प्रकारचे सरकारी फायदे उपलब्ध करून त्या क्षेत्रांच्या विकासाला प्रोत्साहन देणे हा जन समर्थ पोर्टलचा प्रमुख उद्देश आहे. या पोर्टलवर त्याच्याशी जोडलेल्या सर्व योजनांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.


या दोन्ही मंत्रालयांच्या गेल्या आठ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या डिजिटल प्रदर्शनाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांच्या नाणी जारी करण्यात येतील.


या वैशिष्ट्यपूर्ण नाण्यांवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (AKAM) या संकल्पनेचा लोगो असेल तसेच ही नाणी दृष्टीहीन व्यक्तींना देखील सहज ओळखता येतील. हा कार्यक्रम देशात ७५ ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाणार असून प्रत्येक ठिकाण डिजिटल माध्यमातून कार्यक्रमाच्या प्रमुख जागेशी जोडले जाणार आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज

एअरपोर्टवर विराटच्या भेटीला जमली 'विराट' गर्दी; चाहत्यांचा घेराव... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच