आमिष ठरला महावितरणच्या अघोषित भारनियमनाचा बळी

  66

मुंबई / नागपूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये झालेल्या वादळी पावसानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उचगांव येथे फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या  आमिष  काळे यांच्यावर घरीच व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते; परंतु महावितरणने वीज प्रवाह बंद करण्याचा निर्णय घेतला अन् या निर्णयामुळे आमिषचा बळी गेल्याचा आरोप त्यांनी केला.


या घटनेसंदर्भात आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथील पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ऊर्जा मंत्रालयाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. वाटेल तेव्हा महावितरण विद्युतप्रवाह खंडित करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या काही महिन्यात कोळसा संकटाच्या नावावर अघोषित भारनियमाचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील मेळघाट, नंदुरबार व पालघर येथील अतिदुर्गम भागात तासंतास अंधार असतो. अघोषित भारनियमांचे संकट आता मोठ्या शहरातही जाणवू लागल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.


कोल्हापूरमध्ये वादळी पावसानंतर अनेक झाडे कोसळली हे जरी खरे असले तरी प्रगत तंत्रज्ञान आज महावितरणकडे उपलब्ध आहे. राज्यात ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते, त्या वेळेसही वादळी पावसाचे प्रमाण आज इतकेच होते; परंतु आम्ही कधीही वीज खंडित केली नाही. आज कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणला विद्युत खंडित करण्याचा निर्णय घ्यायचा होता, तर त्यांनी पूर्व सूचना देणे अपेक्षित होते. जर ही सूचना देण्यात आली असती, तर काळे कुटुंबाचा आधार असलेला  आमिषचा जीव गेला नसता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ही वीज खंडित करण्याचा निर्णय घेणाऱ्यांवर राज्याच्या ऊर्जा मंत्रालयानेच मन्युष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच सेवेतून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी यावेळी बावनकुळे यांनी केली.


काय आहे घटना?


कोल्हापुरातील उचगांवमध्ये फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या ३८ वर्षीय आमिष  काळे यांच्यावर घरीच व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. वीजबिल थकीत असल्याने ३० मे रोजी  आमिषच्या घरचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केला होता. गेल्या दोन दिवसापासून शेजाऱ्यांकडे वीज घेऊन व्हेंटिलेटर सुरू होते. मात्र बुधवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडीत झाला अन् व्हेंटिलेटर बंद झाल्याने आमिषचा मृत्यू झाला. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी भर पावसात रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, वरिष्ठ पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेतला गेला.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये