मुंबईत ३ हजार ६७९ मॅनहोलवर संरक्षक जाळ्या

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत महापालिकेने आतापर्यंत ३ हजार ६७९ मॅनहोलवर झाकणाखाली सुसज्ज व मजबूत अशा प्रकारची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. पावसाळ्यामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास कोणत्याही मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्वतःहून परस्पर काढू टाकू नयेत. त्यातून दुर्घटना घडू शकतात. मॅनहोलवरील झाकण नागरिकांनी काढल्यास संबंधित नागरिकांविरुद्ध महानगरपालिका प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असा इशारा देण्यात येत आहे.


मुंबईतील पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून दर वर्षी सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. यंदाही ठिकठिकाणी असलेल्या मॅनहोलची तपासणी करून दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे नवीन मॅनहोल लावणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. जोरदार पावसानंतर व पाण्याचा निचरा झाल्यानंतरही महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा सर्व रस्त्यांची पाहणी करून मॅनहोलची तपासणी केली जाते.


या नियमित उपाययोजनांसोबतच मॅनहोलच्या झाकणाखाली प्रतिबंधक स्वरूपाची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही मुंबईत टप्प्याटप्प्याने सुरू आहे. संपूर्ण मुंबईत मिळून ३ हजार ६७९ मॅनहोलवर झाकणाखाली संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात २ हजार ९४५, पूर्व उपनगरात २९३, तर पश्चिम उपनगरात ४४१ मॅनहोलवर संरक्षित जाळ्या लावल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प ) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.


मुंबई महानगरात जोरदार पावसाप्रसंगी सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असते. त्यावेळी महानगरपालिकेचे संबंधित विभागातील कर्मचारी पावसाच्या पाण्याचा निचरा लवकर व्हावा म्हणून सदर मॅनहोल उघडतात आणि तेथे धोक्याची सूचना देणारे फलक देखील लावलेले असतात.

Comments
Add Comment

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदन मुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक

देशभरात वीज होणार स्वस्त

पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा निर्णय जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने

दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची ‘ड्युटी’

शिक्षक संघटनाची नाराजी मुंबई : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना

नीता अंबानी यांनी सुरू केले कर्करोग व डायलिसिस केंद्र

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स